श्री संत नामदेव महाराज – ज्याने या सर्वस्व ब्रह्मांडाची रचना केली, आकाश, पृथ्वी, सर्वस्व सृष्टीची रचना केली, ते तत्व आमच्या सारख्या अज्ञानी सेवेकऱ्यांना म्हणतात, “काहीतरी सांगा.” पण मी काय सांगावे?
आज या अज्ञानी, अडाणी सेवेकऱ्याची कशी काय आठवण झाली? आज महान भाग्य म्हणजे, दर्शन मिळावे ही इच्छा आहे.
अनंत लाघवी तत्व, न धरता येणारे, न सापडणारे, अशांचे गुणवर्णन करणे, त्यांच्याविषयी भक्तीयुक्त प्रवचन सांगणे, म्हणजे त्यांच्या भक्ती विषयी मी काय सांगणार? माझ्या सद्गुरुं पेक्षा दैवत श्रेष्ठ नाही. हे आपल्या चरणांजवळ निवेदन करावे लागते.
हल्लीच्या परिस्थितीमध्ये भक्ती करण्याची सर्वांना आवड असते, त्यात एकच, कुणाला गुळाची चव, तर कुणाला साखरेची चव असते. कुणाला खमंग आवडते, तर कुणाला तिखटाची गोडी असते. कुणाला कशाची, तर कोणाला कशाची? अन् अशा तऱ्हेने आज मानव वाटचाल करीत आहे. ज्याला माहित आहे की हे पदार्थ कशापासून होतात, त्याने त्या निर्माण कर्त्यालाच पकडलेले असते. (पुढे सुरू…२) ©️
