Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

आसन ©️

आसन म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हे. आसनाला अधिकार काय आहेत? कोणी दिधले? कशाकरीता दिले? याचा सेवेकऱ्यानी अंत लावला आहे का? या दरबारातील प्रत्येक ज्योत प्रकाशित आहे. फक्त संचिताप्रमाणे, पूर्व कर्माप्रमाणे वाणीने व ओघाने फळ प्राप्त झाले आहे. 

       या दरबारात, सानिध्यात येण्याला पूर्व जन्मिचा ठेवा लागतो. प्रत्येक अणु रेणू चत्वार खाणीत ह्या दरबाराची व्याप्ती आहे. सर्व ठिकाणी याची व्याप्ती आहे. या दरबारात स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण यातील सुद्धा ज्योती आहेत. त्यांना ह्या दरबारचा अंत घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आसन ते आसनच आहे. याचा अंत कोणालाही घेता येणार नाही. म्हटले तर फारच जवळ आहे, नाहीतर फार दूर दूर आहे. 

       ज्याप्रमाणे हिरा ओळखण्यासाठी, पैलू पाडण्यासाठी पारखी असावा लागतो, पैलू पाडण्यासाठी कारागिरच लागतो. कारागीर कोणत्या तऱ्हेचा असावा लागतो? त्याची कृती ओळखून प्रत्येक सेवेकऱ्याने आचरण करावयास पाहिजे. ह्या दरबारचा तो अधिकार आहे. ©️

You cannot copy content of this page