Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

कोण आहे हे ओळखावे…©️

कोण आहे हे ओळखावे…©️

श्री समर्थ मालिक – या भूमीवर किती अहंकार मातलेला आहे. त्या अहंकाराने सर्वस्वांवर कितीतरी मात केली आहे. गरीब लोकांची काय स्थिती आहे? म्हणून जे कर्तव्य घडवायचे ते घडवून घेणारच ! अन् ते कर्तव्य घडवून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. मायेकडूनच कर्तव्य घडवून घेणार, त्याशिवाय सत कर्तव्याला उज्वलता येणार नाही. सत कर्तव्याची उज्वलता झाली मग काय होईल ते सांगता येणार नाही.

आता थोडी थोडी सुरुवात झाली आहे. सर्वस्व आपल्याला दिसण्यात येईल. मात्र इतकेच आहे, कर्तव्याला सुरुवात कधी आणि केव्हा हे विचारावयाचे नाही. आपल्याला मागेच संदेश दिलेले आहेत. होणार हे होणारच ! ते चुकणार नाही. सेवेकऱ्यांनी घाबरू नये. हे घडल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून आपल्या कर्तव्यात जागृत राहणे. म्हणून तुकारामाच्या बोलाप्रमाणे, कोण आहे हे ओळखावे !

हे सेवेकऱ्यांनी ओळखून जागृत राहावे. फक्त जागृतीतच नव्हे तर आपल्या सताच्या आद्य कर्तव्यात राहावे. अर्थात सताच्या अखंडपदाच्या आसनावरून बहाल करण्यात आलेल्या नामात म्हणजेच नामस्मरणात राहावे. जे नामस्मरण आपणांस कोठेही म्हणजेच चालता, बोलता, उठता, बसता, येथे, तेथे, कोठेही करता येते. ©️

You cannot copy content of this page