Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

तरच कर्तव्य श्रेष्ठ दर्जाचे होईल…©️

तरच कर्तव्य श्रेष्ठ दर्जाचे होईल…©️

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत. सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे, अशी त्यांची भावना आहे म्हणून अवधी लागतो.

काही येणाऱ्या ज्योती आहेत. त्या ओघाने येणारच आहेत. येथील सेवेकऱ्यांना सद्गुरु तत्व पटले असेल तरी आपली श्रद्धा ढळू द्यावयाची नाही. माया सेवेकऱ्यांचा कस घेते आहे पण ती घेऊन घेऊन तरी किती कस घेणार?

सेवेकऱ्यांनो, तुम्ही कोणीही नाहीत. एकच आत्मज्योत तुमच्या स्वरूपात फेकली आहे म्हणून तुमच्यावर मोठा पडदा टाकून तुमच्याकडून हे करून घेत आहे. फक्त एकच ध्यानात ठेवणे, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. तत्त्व जरी महान असले तरी त्याची कृती म्हणजेच त्यांचे कर्तव्य जर यथायोग्य नसेल, तर अशा तत्वाला काहिही अर्थ नाही. म्हणून कर्तव्यता कशी पाहिजे? तर सत् शुध्द. कर्तव्य करताना सत् आचार, सत् विचार, सत् शुद्ध भावना, सताप्रति निष्ठा, सताप्रति आस्था असावयास हवी, तरच कर्तव्य श्रेष्ठ दर्जाचे होईल. (समाप्त)©️

You cannot copy content of this page