Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

भितीने भक्ती होणार नाही…©️

भितीने भक्ती होणार नाही…©️

श्री समर्थ मालिक – हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी तसेच अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी, त्याला काही ना काही करावे लागते. त्यांनी लवकरात लवकर कार्य करावे ही अपेक्षा आहे.

डोळे नसतात त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो, पण संतप्त न होता गोडीने तत्वाशी झगडणे हे अवश्य कर्तव्य आहे. कारण सत् हे कशाचे प्रिय आहे? तर सताचेच प्रिय आहे. मग लिनतेत, नम्रतेत, तुम्ही काहीही म्हणा, इतके लवचिक प्रेम मर्यादित असते ते धीर गंभीर असते. त्यांनी दुर्लक्ष केले तर त्रास होतो. म्हणून गोडीने घेतले पाहिजे. गोडीने मायेने घेतले तर मात्र ते तत्व हवे म्हटले ते देण्यास तयार असते.

हे तत्त्व जे आहे, ते सारखे पाहते आहे. ऐकते आहे. सर्वस्व लक्ष इकडे आहे. ऋषी मुनींनी देखील त्यांची भक्ती केली होती. आत्ता काय आरडाओरडा गोंधळ होतो. भीतीने भक्ती होणार नाही.

आपणाला माहित आहे, काही यात्रेकरू पंढरपूर, काशी अशा ठिकाणी जातात. काशीला जातात स्वयंभू आहे, पंढरीला जातात विठ्ठलाचे दर्शन होण्यासाठी. असे जर आहे तर त्या ठिकाणी रोगराई का निर्माण होते? पण विठ्ठलाला कोणी पाहिले आहे का? ©️

You cannot copy content of this page