Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

तत्त्वच आत चुपचाप आहे…©️

तत्त्वच आत चुपचाप आहे…©️

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला सुद्धा त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यांना ते कर्तव्य उद्या परवा केलेच पाहिजे. हा आदी अंतापासूनचा सिद्धांत आहे.

आधीच्या काळापेक्षा आत्ताचा काळ फार न्यारा आहे. त्यासाठी कर्तव्य लवकर व्हावे असे आपले म्हणणे आहे. त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. रामावतारात १४ वर्षे वनवास काढला. त्यात, एक पण आहे. प्रत्यक्ष तत्वाने कार्य केल्यानंतर जी सहनशीलता अंगात उतरलेली असते…..

तत्त्वाच्या अंगात सहनशीलता असते. ती मानवांच्या अंगात नसते म्हणून मानवांची आणि तत्वांची शक्ती एक होऊ शकत नाही. म्हणून ज्या तत्त्वाने १४ वर्षे कष्ट भोगले, तसे कष्ट सेवेकऱ्याने भोगावे का? सेवेकर्‍याला आपल्या बरोबर धरायचे असेल, तर केव्हा अन कधी? तत्त्वाला जर आपल्या बरोबर धरायचे असेल, तर सहनशीलता वाढवून दिली पाहिजे. तत्त्वच प्रकृती नटवून आत चुपचाप आहे. मग त्यांनीच जर सहनशीलता वाढवून दिली तर १४ वर्षे सुद्धा स्वस्थ बसू.

You cannot copy content of this page