श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला सुद्धा त्याचा दुरुपयोग करता येणार नाही. त्यांना ते कर्तव्य उद्या परवा केलेच पाहिजे. हा आदी अंतापासूनचा सिद्धांत आहे.
आधीच्या काळापेक्षा आत्ताचा काळ फार न्यारा आहे. त्यासाठी कर्तव्य लवकर व्हावे असे आपले म्हणणे आहे. त्यांचेही म्हणणे बरोबर आहे. रामावतारात १४ वर्षे वनवास काढला. त्यात, एक पण आहे. प्रत्यक्ष तत्वाने कार्य केल्यानंतर जी सहनशीलता अंगात उतरलेली असते…..
तत्त्वाच्या अंगात सहनशीलता असते. ती मानवांच्या अंगात नसते म्हणून मानवांची आणि तत्वांची शक्ती एक होऊ शकत नाही. म्हणून ज्या तत्त्वाने १४ वर्षे कष्ट भोगले, तसे कष्ट सेवेकऱ्याने भोगावे का? सेवेकर्याला आपल्या बरोबर धरायचे असेल, तर केव्हा अन कधी? तत्त्वाला जर आपल्या बरोबर धरायचे असेल, तर सहनशीलता वाढवून दिली पाहिजे. तत्त्वच प्रकृती नटवून आत चुपचाप आहे. मग त्यांनीच जर सहनशीलता वाढवून दिली तर १४ वर्षे सुद्धा स्वस्थ बसू.
