Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

सर्व समर्थमय करा…©️

सर्व समर्थमय करा…©️

श्री समर्थ मालिक – सर्व समर्थमय करावयाचे असेल तर संसार नेटका केलाच पाहिजे. ज्याचा संसार नेटका नाही, ती ज्योत गतीमान होणार नाही. शांती मिळणार नाही. माया आणि ज्योत यामधील संघर्षात जी ज्योत आहे ती स्थिर होऊ शकते, पण जोपर्यंत ती मायेला स्थिर करीत नाही, तोपर्यंत स्थिर होईल कशी?

जोपर्यंत सत् ओळखले नाही, तोपर्यंत सत् दर्शन नाही. म्हणून सताचे आदेश मानणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जोपर्यंत मानीत नाही, तोपर्यंत काही नाही.

या दरबारात ज्यांना ज्यांना अखंड नामाची गती दिली, ते सुद्धा म्हणतात, बाबा हे बघा, ते बघा. अजून ते मायेतच आहेत, पण त्या सेवेकर्‍याला हे कळले असते तर? कळले म्हणावे तर सेवेकऱ्याने कुटुंबाला का शांती देऊ नये? एवढा अधिकार दिला आहे. ते म्हणतात, तुम्ही हात फिरवा. ज्याचा त्यानेच हात फिरवावा. ते तुम्ही करून पहा. हे करायचे सोडून, तुम्ही करा. तुम्ही बघा. म्हणून जेवढे तुम्ही तुमच्या आचरणात आणाल, तेवढा तुम्हाला फायदा होईल. सर्वांनी आपआपल्या कर्तव्यात रहा हे संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page