Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

प्राण अर्पण केलेला आहे कां?…©️

प्राण अर्पण केलेला आहे कां?…©️

श्री समर्थ मालिक – एकाचे सख्यत्वासाठी | पडाव्या जिवलगांसी तुटी ||सर्वही अर्पावे शेवटी | प्राण तोही वेचावा ||

एकाच्याच (ते एक म्हणजे आपले सद्गुरु) त्यांच्या ध्यानासाठी, एकाच्याच (त्यांच्या) नामासाठी, एकाच्याच (सद्गुरुंच्याच) सख्यत्वासाठी ते कसे करावयाचे? त्यांना आपलेसे कसे करावयाचे? हे जर गुह्य सापडले तर आपसात हेवेदावे, मदमस्तर निर्माण होईल का? एकाच तत्त्वावर ठाम राहिला, तर भक्ताला इथे तिथे भटकण्याची आवश्यकता काय? ज्योतिष, राशिभविष्य पाहण्याची आवश्यकता काय? एका समर्थांच्या ठिकाणी दृढ:भाव, ठाम श्रद्धा वाहिल्यानंतर बाकी काही उरेल का? एकाचे सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पण केल्यानंतर मन दुसरीकडे धावणार नाही, जाणार नाही. वर्मच पाहिल्यानंतर त्याचे मन दुसरीकडे जाणार नाही. मग अशावेळी मात्र प्राण त्या ठिकाणी अर्पण केलेला दिसून येतो.

दृढ:निश्चय, ठाम श्रद्धा, यामुळे त्याचा प्राण अगोदरच अर्पण केलेला असतो. बरं, प्राण अर्पण केलेला आहे हे मी कशावरून ओळखायचे? प्राण अर्पण केला आहे असे म्हटले म्हणजे होते का? प्राण अर्पण केलेल्याची भावना ओळखून येते. असेच जर असेल तर इतर मानवांना कळून येते.

तेव्हा तन मन धन हे सर्वस्व त्याने अर्पण केल्यानंतर मग बाकी उरले काय? आता ही तिन्ही तत्त्वे कशावर चालली आहेत? कोणाच्या सत्तेने चालली आहेत? प्राण सर्वस्व अर्पण केलेल्याची गती कशावरून दिसून येते, त्याची स्थिती कशी ओळखली जाते? तर त्याच्या चेहऱ्यावरचे तेजच वेगळ्या तऱ्हेचे दिसते. त्याला एका भगवंताशिवाय काही दिसत नाही. त्याच्या प्रकृतीवरचे, तोंडावरचे तेज सात्विक दिसते. म्हणून त्या तऱ्हेची कृती झाली, तरच प्राण अर्पण केल्यासारखे होते. ©️

You cannot copy content of this page