Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

ॐ कार म्हणजे काय?©️

ॐ कार म्हणजे काय?©️

श्री समर्थ मालिक –

ॐ कार म्हणजे काय? कुठून आले? कोणी निर्मिती केली? तर अखंड तत्व, तेथून धूनधूनकार, अन् त्यापासून ॐ कार निर्माण झाला. तोच ओमकार ! आकार हा ओंकार स्वरूप झाला, मग प्रश्नच उरत नाही. मग तत्वा समान झाले. प्रकृती आणि तत्व भिन्न आहे असे मानले तर ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे. तत्व आणि प्रकृती एक झाली तर तू आणि मी वेगळा नाही. पण आताचा काळ मायावी आहे, म्हणून ॐ कार स्वरूप बनणे कठीण आहे.

आसनाधिस्तांना मी काही अनुग्रह दिला नाही. फक्त माझा स्पर्श झाला आहे. आपण धावा केला म्हणून यावे लागले. पण सेवेकर्‍याचे कोडकौतुक पुरवले की नाही? सत् आहे नां? पण काही कर्तव्यामुळे सेवेकऱ्याचे अन माझे बोलताना वाकडे आले. त्यामुळे अकरा वर्षे माझे नाव गोष्ट नाही. फक्त आसनावर माझ्या आकाराची छबी आहे, पण तत्वाचे अन् सेवेकऱ्याचे खटकले होते कि नाही? कर्तव्यावरूनच ना? ज्या वेळेला अखंड तत्वाने संदेश सोडले, ॐ कारेश्वराला बोलवा, चैतन्य उडवले होते अन् त्या वेळेला मातेचा धावा केला, तिथपासून आठवण नाही.

मी फक्त तसबिरीतच आहे का? म्हणून सेवेकरी कसा आहे, कसा नाही हे मी ओळखले आणि म्हणूनच पूर्व जन्मीचे सत् कृत्य अखंड होते म्हणून हिमालयात बसवले तेव्हा भगवी वस्त्रे होती. हे कर्तव्य इतरांकडून होणार नाही. त्यामुळे हिमालयातून कोकणात पाठविले. आपण मला ओळखले, मी तुम्हाला ओळखले ! यातील सेवेकर्‍यांची तितकी पात्रता नाही. यांच्याकडून टोलवा टोलवी ही होणारच. ही अशी तऱ्हा आहेच. या मानवी सेवेकर्‍यांची तितकी पात्रता नाही. सेवेकरी असे बनले तर आपणाला त्रास होणार नाही. ©️

You cannot copy content of this page