Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

कर्तुम् अकर्तुम् शक्ती ©️

कर्तुम् अकर्तुम् शक्ती ©️

श्री नर्मदा निवासी मालिक – कर्तुम् अकर्तुम् जी शक्ती आहे, त्यांच्या भक्तांना व्याप होतात. त्याची पाहणी करणे कर्तव्य आहे. आकाराला चेतना देऊन निराकारी पदाने व्यवहार करणारी ती शक्ती लाघवाने खेळ खेळते.

कृष्णावतार त्यांनी नटविला हे मला मान्य आहे. त्यावेळी पार्थाला सांगितले, “मी पाप पुण्या निराळा ! सुख दुःखा वेगळा ! मज दंड कोण करी?” असे जे म्हटले होते ते कृष्ण म्हणत नव्हता.

कृष्ण हे ॐकार स्वरूप आकारी होते, पण आकार बोलत होता तो कशाच्या आधारावर? तो आकार कृष्ण समान झाला होता म्हणून प्रणव बाहेर पडत होते. करणारे तेच आणि निवारण करणारेही तेच आहेत. लाघवी तऱ्हेने खेळ खेळणारेही तेच आहेत. कोणत्या भक्ताला मोकळे सोडले आहे? चुकूनही नाही.

रामावतारात १४ वर्षे वनवास काढण्याची काय आवश्यकता होती? कृष्णावतारात ज्याप्रमाणे मानवी बुद्धी फिरत होती, त्याप्रमाणे वळसा घालून हे कर्तव्य करावे लागले. सतासाठी उलटे सुलटे करावे लागले. मानव कृष्णावताराला चांगले म्हणतात ते का? ज्यावेळी वाली सुग्रीव यांचे युद्ध झाले, त्या वेळेला सुग्रीवाला मारण्याची आवश्यकता काय होती? पण त्यामध्ये मुख्य मुद्दा काय आहे हे मानव बघत नाहीत. ते घेत नाहीत. ©️

You cannot copy content of this page