Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत ©️

कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत ©️

प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या कर्तव्यात राहणे हे संदेश आहेत. त्याच्या पूर्व संचिताप्रमाणे जे लागेबांधे आहेत ते श्रेष्ठ आहत. हे नाते (सद्गुरु आणि सेवेकरी) अखंड आहे. अखंड पद आहे. ८४ लक्ष योनीत जरी सेवेकरी भटकला तरी सद्गुरु पदाचा ठाव घेण्यासाठी त्याला पुन्हा मानव जन्मात पाठवितात. तेव्हा सद्गुरूंच्या मुखातून मिळालेले अमृततुल्य प्रणव जतन करणे हे सेवेकऱ्यांचे महान पवित्र कर्तव्य आहे.

कालांतरापासून सेवेकरी आणि सदगुरू, गुरु आणि शिष्य हे नाते फार श्रेष्ठ आहे, अखंड आहे. आपल्या सेवेकऱ्याला शुद्धीवर आणण्यासाठी ते लाघव करतील, नाना तऱ्हा करतील, वेळेला शिक्षाही करतील. पण ते दूर फेकणार नाहीत हे सेवेकर्‍यांनी ध्यानात ठेवावे.

हे आसन बघितले तर काही दिसणार नाही. प्रकाशमान सेवेकऱ्यांनी चाचपून बघावे. कोणत्या तर्‍हेचे हे आसन आहे? याची पूर्णत्वाने छाननी करावी. अनेक वेळेला ऐकले ते सेवेकऱ्यांच्या हृदयी बिंबले पाहिजे. पूर्णत्वाने समजले पाहिजे. तरच त्याला महत्त्व आहे.

मानवांना, सेवेकऱ्यांना सत् पदाची गती जरी आहे, तरी त्यांची इच्छा होते. मालिक प्रत्येक वेळेला संदेश देतात. वर्ष येते आणि जाते, पण त्याला अंत नाही. जो संदेश दिला, त्यात मागे पुढे होणार नाही. असत होणार नाही. पण काही काळ, अन्यत्र कारणांमुळे मागे पुढे होत असते. कारण जगाची रचना निराळी आहे. कालचक्र हे सारखे फिरत असते. देवाण-घेवाणही चालू असते. तरीपण कालचक्र हे थोड्या कारणाने मागे-पुढे होते. जे घडणार आहे ते घडणारच ! याबाबतीत थोड्याच अवधीत आपणाला संदेश मिळतील. आपल्या मानवी तत्वाप्रमाणे हे ६वे, ७वे वर्ष आहे. पण कालचक्र हे फार निराळे आहे. ©️

You cannot copy content of this page