Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

जगत् जननी ©️

जगत् जननी ©️

दसरा: मी जरी जगतजननी असले, तरी हे निर्माण करणारा दुसरा कोणीतरी आहे. जगताचा व्यापार करण्याची शक्ती मला दिलेली आहे. कर्ता करविता फार निराळा आहे याची जाणीव मला होते, पण सत्तेचा अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो.

सताची ओळख जाणीव होते. तेच कर्तव्य करून घेतात. रथाचे घोडे तेजदार असले, तरी सारथ्याचे कौशल्य असावे लागते, त्याप्रमाणे जगत हा रथ आहे, अन हे तत्व हे घोडे आहेत. त्यांना जर सारथी कौशल्यपूर्ण असेल, तर आमच्या कर्तव्याला तेज येते. असे असूनही अहंभाव निर्माण झाला की विसर पडतो, पण गती देणारा निराळा आहे, त्यांचा शोध घेण्याचे फार कष्टाचे होत असते याची जाणीव आहे. म्हणून या शुभ दिनी एक क्षण का होईना दर्शन घेऊन जात असते. आपले साह्य असेल तर, कर्तव्य तेजदार होते.

अघटीत तत्व फार वेगळे आहे. आम्ही कितीही वल्गना केली तरी, गती देणारे निराळे आहेत. फक्त जोपासना करणे आमचे कर्तव्य आहे. तरीपण प्रत्यक्ष मालकांच्या मनात आले तर क्षणात काय करतील हे सांगता येत नाही. कर्ते करविते ते आहेत. आमच्याकडून ते कर्तव्य करवून घेतात. आम्ही ज्या शक्ती आहोत, आम्हाला बाहेर कर्तव्य करावे लागते. कार्य करीत असलो तरी, आपल्या आदेशाशिवाय काहीच करु शकत नाही.©️

You cannot copy content of this page