Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

अवतार कार्य -२©️

अवतार कार्य -२©️

श्री समर्थ मालिक – प्रत्येकाला माहित आहे की कंस हा मामा असताना कसे कर्तव्य केले. कौरव, पांडव सुद्धा आप्तच होते. त्यांना फेकले नाही, पण त्यांनी जे वलय निर्माण केले ते तोडण्यासाठीच हे युद्ध घडविले. ज्या वेळेला मानव अघोरी कृत्याला बळी पडतो त्यावेळेला अवतार कार्य नटवून त्याचा नि:पात करावा लागतो.

आता सुद्धा हीच गती निर्माण झाली आहे. मानव हा पराकोटीला जाऊन, पूर्णत्वाने वासनेच्या आधीन गेला आहे. काळ समीप आला आहे. वेळ भरल्याशिवाय गती देता येणार नाही. निसर्गचक्र फिरणार आहे. स्थूलरुपी मानवाचा नि:पात होणार आहे. पण कधी हे सांगता येणार नाही. वेळ अगदी समीप आली आहे. कार्य करावयाचे आराखडे आधीच तयार असतात. स्थूलावरच आक्रमण होणार आहे. अगोदर निसर्गतऱ्हा, त्याने जर मानव शुद्धीवर आला नाही, तर प्रत्यक्ष मानवांचा उच्छेद करावा लागतो. निसर्ग तऱ्हा सुरू होईल. पुढे मानवाचा स्थूलांगी उच्छेद करण्याची चक्रे फिरू लागतील.

त्याप्रमाणे कलियुगात हेच आहे. ज्या वेळेला मानवांची त्राही, त्राही अशी स्थिती होते, त्यावेळेला सत तत्व जागृत होऊन असताचा नि:पात करण्याचे कर्तव्य पार पाडीत असते. अद्याप वेळ भरलेली नाही, थोडा अवधी आहे. ती वेळ आली की त्याप्रमाणे चक्रे फिरतील. प्रत्यक्ष स्थूलावर कर्तव्य करण्याची वेळ येणार आहे. आता जरी मानव जर्जर झाला असला तरी अजून पूर्णत्व गती झालेली नाही. ती वेळ आली की मग वेळ नाही. नि:पात होतो. प्रत्यक्ष स्थूलाने घटना घडते आहे. थोडासा अवधी आहे. सताला कोणीही बाधा देणार नाही. ©️

You cannot copy content of this page