Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही,…©️

जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही,…©️

श्री समर्थ मालिक – यात काही कमी नाही, रिते नाही, पण सेवेकरी ओळखणारा पाहिजे. प्रकृतीचे खेळ आहेत. ते अतोनात चंचलयुक्त असतात अन् म्हणून ते भिन्न आहे. ज्या वेळेला प्रकृती अभिन्न होईल, त्याच वेळेला सद्गुरु व त्यांची लिला याची गती मिळेल. मी सर्व भूतेषु पश्य असे निवेदन आहे आणि असे काही सेवेकऱ्यांच्या आढळण्यात असेल.

प्रकृती स्वयमेव आहे, प्रकृती जन्म धारण करते असे आढळले आहे का? मग अनंत रूपे, अनंत नामे असे जे म्हटले आहे, ते कोण नटले आहे? मला नाही चरण, नाही नाक, कान, नाही डोळे, नाही तोंड पण बोलतो. फार सुंदर पाय नाहीत, पण चालतो. मी सर्वव्यापी आहे.

स्थूल देही आहेत, त्या स्थूलाचे व्यवहार कोणाच्या सत्तेने चालतात? जर सद्गुरु कृपेने सर्व चालते, मग तुझे माझे का होते? म्हणून जोपर्यंत अज्ञानपणा जात नाही, तोपर्यंत सद्गुरु चरण तीर्थ प्रगटणार नाही.

सेवेकरी म्हणतात, ही प्रकृती आहे, पण ती कोणाच्या आधीन आहे? ती कोणाच्या स्वाधीन आहे? ती प्रकृती केव्हा फेकून देतील याचा थांगपत्ताही लागू देणार नाहीत. ते बाहेर केव्हा पडतील, हे कुणीही सांगू शकत नाही. ती प्रकृती चांगली असल्यास, ती राहण्याकरता वैद्यकीय उपचार करतात, पण बाहेर पडावयाचे असेल तर औषधोपचार करूनही ते बाहेर पडतातच नां? मग नाराज जे होते, ते कोण होते?

ज्या ठिकाणी अज्ञान आहे, त्या ठिकाणी काही कळणार नाही. ज्याची प्रकृती सतशुद्ध आहे, त्यानेच हे ओळखले. सद्गुरु शिवाय कोणतीही हालचाल होत नाही. त्यांच्या कृपेशिवाय कोणीही हालचाल करू शकत नाही. हे समजले, मग राहिले काय? होते काय? एवढी गती जर सेवेकर्‍याला असेल तरच समजेल.©️

You cannot copy content of this page