Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सद्गुरु चलाख नसतील तर…©️

सद्गुरु चलाख नसतील तर…©️

श्री विठ्ठल – सद्गुरुना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयंमेव तत्व असल्यामुळे ते स्वयमच चलाख आहे. सत् चलाख आहे म्हणूनच सेवेकऱ्यांना अनुभव देता येतो.

सेवेकऱ्यांना प्रत्यक्षात अनुभव दिलेला आहे. थोडे या ठिकाणी स्थिर झालेले आहेत. ज्या सेवेकऱ्यांनी सद्गुरु चलाख आहेत, हे अनुभवलेले आहे, त्यांना दहशत आहे. अजून अज्ञानाचे पांघरूण घेऊन राहिलेले आहेत, ते ते पांघरूण दूर सारतील त्याच वेळेला त्यांना कळेल, सद्गुरु ही काय चीज आहे?

हल्लीचा काळ असा आहे? परमेश्वर वेगळा आहे तो कसा पाहता येतो? सद्गुरुना समजतात की आपल्या सारखाच मानव आहे. ही मानवांची भूमिका आहे. ती सुधारण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु ही काय चीज आहे हे कळले नाहीतर ध्यान कसे करणार? ज्याला याचा गंधच नाही, तर कपाळी टिळा लावील कसा? गंध हे काय आहे हे ओळखले म्हणजे तो टिळा लावून शुद्ध बनतात. नुसता टिळा लावून शुद्धत्त्व होत नाही. सद्गुरू ज्यावेळेला त्याला टिळा लावतील, तेव्हाच तो शुद्ध (अनुग्रहित) होईल. वाटचाल करील. तो तरी वाटचाल करणारा कोण? सद्गुरु त्याला दाखवितात, फिरवितात. मी पाहतो, मी अनुभवतो. दाखवतो कोण? फिरवतो कोण? हे जोपर्यंत कळले नाही, तोपर्यंत अज्ञानात आहे असे म्हटले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page