Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी कोठे असतो? ©️

मी कोठे असतो? ©️

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत, योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? सत् भक्तांच्या ठिकाणी मी असतो, तेथेच का असतो? भक्त सद्गुरु चरणांत तादाम्य झाल्यानंतर, मी त्या ठिकाणी उभा असतो, कारण ती भक्ती निष्काम असते. फक्त त्या ठिकाणी दर्शनाचीच इच्छा असते अन् म्हणून त्या ठिकाणी मी जातो.

मी योग्यांच्या ठिकाणी सापडत नाही, कारण योगी हे साधना साध्य करून घेण्याचे मार्गात असतात. त्यांचे ठिकाणी चमत्कार, नमस्कार असतात. मग योगी श्रेष्ठ का भक्त श्रेष्ठ? योग्याला मी सापडलो असतो, तर तो चमत्काराचे आधीन गेला नसता. त्याला सत काय आहे हे कळलेले नाही.

आदीअंतापासूनचे संदेश आहेत की मी प्रणवातीत आहे. मग योग्याला प्राणायाम करण्याची आवश्यकता काय? भक्त त्या प्रणवातच निमग्न होतो तो प्रणव येतो कुठून? अन् जातो कोठे? तेच ते वैकुंठ ! ज्या ठिकाणी रमणीय स्थान, शांत ठिकाण, त्याच ठिकाणी मी स्थिर असतो. ते वैकुंठ ज्याने साधले, तोच खरा श्रेष्ठ भक्त होय. तेव्हा अखंड नाम, तोच प्रणव ज्या ठिकाणी स्थिर होतो तेच वैकुंठ !!

लाघवी तो मीच आहे. सूत्रे हलविणारा मीच आहे, पण याचा शोध घ्यावयास पाहिजे. मानव अनेक दृष्टीने पाहून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वाटेल ते करतो. यात आसन, आसनाधीस्त शंकाकुल राहू शकत नाही.

या ठिकाणी ज्ञान म्हणजे प्रकाश आहे. ते कुठे आहे, कोठे नेते हे मिळविण्यासाठी ज्योती त्या तऱ्हेच्या पाहिजेत. अजून बाहेर ज्योती रखडत आहेत. त्या पुढे येतीलच. या ठिकाणी आहे ते दुसऱ्या ठिकाणी नाही. कर्तव्याची तऱ्हा ज्या तऱ्हेची त्याप्रमाणे कर्तव्य करून घ्यावे लागते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page