श्री समर्थ मालिक – आत्ताची जी भक्ती आहे ती कशासाठी? तर जो मानव करील, त्याच्याचसाठी ती आहे, अन् ती भक्ती त्याच्याच बरोबर असते. दोन्ही उभयता जरी असलात तरी नवऱ्याने केली ती बायकोला नाही अन् बायकोने केली ती नवऱ्याला नाही.
आता सांगा, या दरबारात एकाच घरात एकाच कुटुंबात किती सेवेकरी आहेत? त्यांचीच वळणे पहा. सताच्या वचनाप्रमाणे चालले आहेत का ते? आता तुम्ही तसेच घडविले तर सता प्रमाणे केले जाते.
या दरबारात काही एका तपाच्या, काही दोन तपाच्या ज्योती आहेत. काही अनेक तपाच्या होऊन गेल्या आहेत. त्या जर अशा करू लागल्या तर नवीन ज्योतींना कसे वळन द्याल? म्हणून मनाला वळण देण्यासाठी शुद्धीकरण करावे लागते. काही ज्योतींना अनुभव दिलेला आहे. काहीना द्यावयाचा आहे. येणारा काळ निराळा आहे. दरबारात येणारेच भक्त नाहीत. अनेक भक्त बाहेर सुद्धा विखुरले आहेत. ते मानव शुद्ध करण्याचा आराखडा चालला आहे. त्या आराखड्यातून एक म्हणा, दोन म्हणा तपाच्या ज्योतीनी सुधारावे हे संदेश आहेत. ©️
