Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

एक तत्त्व नाम…©️

एक तत्त्व नाम…©️

श्री समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, त्या तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक सेकंद सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.

शरीर हे जडत्व आहे. तेव्हा जडत्वावर वाटेल ते व्याप, मायावी तऱ्हेचे म्हणा किंवा आणखी काही म्हणा, जर झाले, तर, सेवेकऱ्याने मनाची जी स्थीरता, जी अदला बदल होते, ती होऊ न देता स्थीर राहण्याचा प्रयत्न करणे. जेवढी होता होईल तेवढी शांती टिकविण्याचा प्रयत्न करणे, तदनंतर त्याचा उपभोग घेणे, अवश्य मिळेल. हे मात्र असत नाही, सत्य आहे. त्याप्रमाणे आपापल्या कर्तव्यात, अखंड नामात, मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे.

आपल्या संगतीने काय येणार, हे सेवेकऱ्यांना माहित झाले असेलच. संगती जे येईल तेच घेण्याचा प्रयत्न करणे. या जन्मी कमावलेली सत् संपत्ती, तिचा पुढील जन्मी उपभोग घेता येईल. सध्या दुःख वाटते, पण दुःख वाटून न घेता शांत रितीने राहणे, वावरणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे व हे संदेश आहेत. ©️

You cannot copy content of this page