Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

कोण देतो अन् कोण घेतो ? ©️

कोण देतो अन् कोण घेतो ? ©️

श्री समर्थ मालिक -जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य ||

ज्ञान म्हणजेच प्रकाश ! संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून नाही. संत आहेत काय? टाळ वाजून किती चालले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप? जप कोणाचे? प्रकाश कोणाचा? याची गती आहे काय? किर्ती, जप, तप करून तरी मिळू शकले आहे काय? पहावयास गेले,‌ घ्यावयास गेले तरी घेता येत नाही.

अशाच काही संतांनी घेतले, ते घेऊन गेले. खटपट, खटाटोप मानवाचा ! खटाटोप संत नाही करत. अन् कराल तर मुक्ती मोक्षाला जाल काय? हे करत आहे, ते करत आहे असे काही मानव आहेत. या दरबार मध्ये सेवेकरी आहेत. पण करून घेणारे कोण आहेत? असे तत्व जोपर्यंत अशा मानवाला कळले नाही, तोपर्यंत जप तपाचा काही उपयोग नाही. विशेष ! आसनाच्या सेवेकऱ्यांना तरी जप तप कळले आहे काय? कसले ज्ञान पाहिजे? मानवाने मानवता ओळखली नाही तर पुढे काय? ज्याला अखंड नाम पाजले आहे, अन् पुढे काय? असे हे तत्व आहे. त्याच नामाचा जप अन् तप अन् त्याचीच खटपट तन्मयतेणे करणे.

लिनता, नम्रता आणि शांती यांचा त्रिवेणी संगम हेच मोठे ज्ञान आहे. ज्ञानाचा प्रकाश आहे. दोघेही सेवेकरी आहेत. सेवेकऱ्यास ज्ञानाप्रमाणे कुठे घालवायचे व ठेवावयाचे, त्याचे ज्ञान पाहिजे आहे अशी सेवेकर्‍यांनी अपेक्षा करू नये. कोण देतो अन् कोण घेतो ? ज्यांना अखंड तत्व मिळाले आहे, त्यांचे आदेश, संदेश मानले आहेत काय? ©️

You cannot copy content of this page