Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

गुरुपद – २ ©️

गुरुपद – २ ©️

श्री समर्थ मालिक – एकमेक एकमेकांवर अवलंबून आहेत. आपण मानव आहात. संशयात, षड्रिपूच्या जाळ्यात गुरफटले आहात. या सर्वस्वातून सुटका करणारे, एक महान श्रेष्ठ पद आहे. तेच हे गुरुपद आहे. त्या गुरुपदाशिवाय सेवेकऱ्यांना वाचविणारे, तारणारे, त्यांचे कोडकौतुक पुरविणारे दुसरे कोणीही नाही. सद्गुरु आणि सेवेकरी यांचे नाते संबंध फार निराळे आहेत, वेगळे आहेत. आपल्या सेवेकऱ्यांसाठी ते हेलावतात. लयबद्ध होतात. कोणालाही ते दूर लोटित नाहीत. असे हे पूर्णत्वाने दयाघन तत्व आहे. ही दया इतर ठिकाणी आढळणार नाही. सेवेकरी कोणत्याही तऱ्हेचा असो, तो सद्गुरुमय व्हावा अशी त्यांची आंतरिक तळमळ असते.

कर्तव्य केल्यानंतर मुक्ती आणि मोक्ष दूर नाही. आपण जाणते सेवेकरी आहात. ओळखण्याची खूण थोडी आहे, ती ज्याला मिळाली तो धन्य होय. ज्यांना मिळाली नाही, त्यांनाही ती मिळेल. पण हळूहळू कालांतराने.

हे सानिध्य मिळायला भाग्य लागते. सेवेकऱ्यांना सद्गुरु कधीही दूर लोटित नाहीत. दूर जाऊ देत नाहीत. असे हे दोन तत्त्वात भरलेले सद्गुरुपद, याचाच ठाव सेवेकर्‍यांनी घेणे. हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला सेवेकऱ्याला आपल्या अमृतमय वाणीने सिद्ध करण्यासाठी संदेश देत असतात. ते संदेश सेवेकऱ्यांनी पाळावयाचे असतात. या संदेशांना फार महत्त्व आहे. याचे निवेदन केलेले आहे. जरी सेवेकर्‍यांनी संदेश पाळले नाहीत, तरी सद्गुरु कोपिष्ट होणार नाहीत. त्याला गोड शब्दात समजावून सांगतील. ©️

You cannot copy content of this page