श्री विठ्ठल – दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वाजवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते भक्ताला कधी सानिध्यात घेतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मीच सर्वस्वाचे निधान आहे असे नाही. एकमेक एकमेकावर अवलंबून आहेत.
आपण प्रत्यक्ष आहात. मी अदृष्य आहे. प्रत्यक्ष स्थूल देही व्यवहार या ठिकाणी आहे. लाखावर यात्रा जरी भरली तरी मला कोणी पाहिले नाही. पाहणारे भक्त गेले. आता या काळात कोणीही नाही. हौसे, नवसे, गवसे हे त्या ठिकाणी गेले आहेत. सत् भक्त म्हणून नाही. आपल्या आदेशा प्रमाणे त्या ठिकाणचे परिवर्तन चालले आहे. मालिक कोणास म्हणावे, हे सुद्धा मला कळेनासे झाले आहे.
आत्ताचा काळ तसा नाही. भाविक भक्त म्हणावे तर ती ज्योत भक्तीतच रममाण झाली पाहिजे. भक्तीत रममाण झाली, तर एवढ्या लांब येण्याची आवश्यकता काय? सेवेकरी देऊन देऊन काय देणार आहे मला? कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का? कोणीही भक्त बिलकुल मागणी न करता परतला आहे का? मग हे भक्त आहेत असे म्हणता येईल का? ©️
