श्री समर्थ मालिक – येथे दरबारात खूप प्रवचने होतात. येथे सत् सानिध्य आहे. येथे मी आहे व बाहेर पण मी आहे. परंतु जो सेवेकरी ठाम आहे, तो कोठेही असो, त्या सेवेकऱ्यास भीती नाही.
जे सेवेकरी कर्तव्यासाठी ठाम आहेत, त्यांच्याकडून कर्तव्ये करून घेतली जातात वा कर्तव्य करून घ्यावयाचे आहे. कर्तव्यात कसर नको. संशयातीत सेवेकरी येथे असतात त्यांच्या मनाच्या आत कोण आहे? त्यांच्या मनात संशय असल्यामुळे सेवेकरी घाबरतात. ते अजून बाकी आहेत. येथूनच सर्वस्व घडत असते.
सर्वस्व प्रकाशित ज्योती आहेत. पण कशापासून असे होत असते? आपण एवढे सांगत असता, किती वर्षे इथे आहात, मग यांनी गती घेतली का की आसनावर काय चालते म्हणून? तुम्हीच पहा आणि सांगा. सर्वस्व मी बोलत असतो,
कृती कृती म्हणजे काय? नामस्मरण होत नाही कारण बसणार कुठे? त्यासाठी बसावयास लागतेच असे नाही.
तत्व – त्यामध्ये रममाण होणे गरजेचे आहे. तत्व सोडून ज्ञानी होता येईल का? तत्त्व न सांभाळल्यामुळे ठाम कसे होता येईल? आपली चार तत्वे प्रमुख आहेत – ज्याला ती ज्ञात आहेत, तो माझ्यापर्यंत येत असतो. त्याची ही दृष्टी सर्वत्र सत् सगुण सामावलेली असते.
मी कोठे दूर नाही. मी प्रत्येकात रममाण होतो. प्रत्येक ज्योतीत रममाण होणारे हे तत्व आहे. प्रत्यक्षात मानव निवेदन देतो. त्यांची निवेदने मी ऐकत असतो. तो प्रणव टाकत असतो त्याप्रमाणे खरोखर झाला आहे काय? तो कित्येक कर्तव्ये करीत आला असता, पण मनामध्ये विचार आहेत. त्यामुळे निवेदन करीत असतो. त्याच्या मनातच काहीतरी आहे. ©️
