Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मऊ मेणाहूनी आम्ही…©️

मऊ मेणाहूनी आम्ही…©️

श्री समर्थ मालिक – मऊ मेणाहूनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे |

मऊ मेणाहूनी म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ असा सेवेकरी कोण होता? संत तुकाराम ! मऊ होऊनच त्याने वज्रापेक्षा कठीण असणाऱ्या तत्वाला म्हणजे प्रकृतीला, कष्ट मिळाल्यानंतर भक्ती कठीण आहे असे त्याने सांगितले. म्हणून वज्रापेक्षाही कठीण असले तरी लवचिक कसे होते, कसे करावे हे तुकोबाला माहित होते अन् म्हणून त्याने म्हटले आहे, लोण्यापेक्षाही मऊ म्हणजे त्रिवेणी संगम त्यात आला की नाही? मग मेणापेक्षा मऊ असे ते भक्त, त्या तत्त्वांपाशी मौन धारण करून असतात.

तुकोबा जेव्हा जागृतीत दंग होत होते, त्यावेळी त्यांना कठीणता भासत होती का? आताचे सेवेकरी आहेत त्यांना कठीणता भासते. हे बोल त्यांनी केव्हा काढले? आपल्या तल्लिनतेतून उतरल्यानंतर काढले की आधी काढले याची छाननी करावयास हवी. अनुभव तैसाच अधिकार, अधिकार तैसाच अनुभव ! त्याप्रमाणे त्यांने कर्तव्य केले.

तुकोबांनी अगोदर हे कशासाठी म्हटले होते अन् का म्हटले होते? कारण ती ज्योत त्या पात्रतेची होती. कितीही त्रास झाला, अडीअडचणी आल्या, पर्वत कोसळले, तरी त्यांचा देह विचलित झाला नाही. आत्ताच्या सेवेकऱ्यांना थोडासा त्रास होऊ द्या, मग बघा तो काय म्हणतो? मग आताचे सेवेकरी मऊ मेणाहूनी मऊ आहेत का नाही? पण समर्थांचा दृष्टिकोन आहे, तो त्यांनी सोडला आहे का? थोडासा जरी त्रास झाला की, सेवेकऱ्यांची धावपळ होते. चार शब्द वेडेवाकडे बोलून, काखा वर करून, उभा राहण्यास तयार. थोडासा जरी त्रास झाला की, बाबा काय, आम्ही सेवेकरी असे म्हणावयास मागे पुढे पाहत नाही. परंतु सद्गुरुंनी त्या दृष्टीने पाहिले आहे कां? ©️

You cannot copy content of this page