Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी भक्तीचा भुकेला – ©️

मी भक्तीचा भुकेला – ©️

श्री समर्थ मालिक – जोपर्यंत स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळत नाही, तोपर्यंत मोक्ष नाही. स्वयंप्रकाशात सद्गुरु दर्शन मिळणे हीच मुक्ती आणि हाच मोक्ष आहे.

प्रथम भक्ती श्रेष्ठ ! त्यात त्याला मुक्ती मोक्षाची गती नाही.

सूक्ष्माची गती सद्गुरु देतात, मग तो सूक्ष्मात तल्लीन होतो. त्याचे सूक्ष्म त्याला दिसते. त्याच्यात रममाण झाल्यानंतर कारण, महाकारण येथपर्यंत गती असते. अणू, परमाणूत गेल्यानंतर त्याला काही कळेल का? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण याचा विसर पडल्यानंतर पुढे त्याची गती आहे की नाही हे त्याला कळत नाही. मग अणू, रेणू परमाणू त्याला काय कळणार?

सद्गुरु महाकारणापर्यंत गती दाखवितात. पुढे जरी त्याला नेले तरी त्याला ते समजणार नाही. सर्वस्वाचा विसर पडल्यानंतर, सद्गुरूंच्या ठायी तल्लीन झाल्यानंतर, त्याच्या डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू येतात. त्यालाच सच्चिदानंद असे म्हणतात.

जडत्व शाश्वत अन् अशाश्वत या दोन्हींवर अवलंबून आहे. शाश्वताकडून अशाश्वत कर्तव्य करून घेते. म्हणून शाश्वताला महत्व आहे. शाश्वत आहे त्याने केव्हा उपदेश केला आहे का? म्हणजे आकार आणि निराकार ! आकाराकडूनच सर्वस्व करून घेतले जाते. निर्विकाराकडून उत्तरे मिळतात. पण कधी?

निर्विकाराने किती जरी सांगितले तरी तो ऐकणार नाही, पण आकाराने सांगितल्यानंतरच तो गतिमान होतो, म्हणून शाश्वत आणि अशाश्वत दोघांचाही नाश होत नाही.

इतकेच आहे, हे जड आहे, दृश्य आहे. ते अदृश्य होते. पंचमहाभूतांचा हा पुतळा आहे. पाचही तत्वे याच्यात मिश्रण होतात. मग शाश्वत की अशाश्वत कोणी पाहिले आहे का? नाश जर पावले तर सूक्ष्म कसे निर्माण होते? मग पुन्हा जन्माला येतो कसा? म्हणून सेवेकऱ्यांनी भक्तीच्याच मार्गाने जाणे. महान संतांनी देखील हेच सांगितले आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तीनेच ओळखता येते. भक्तीनेच भक्त माझ्याजवळ येऊ शकतात. प्रथम भक्त असेल, तदनंतर मुक्ती आणि मोक्ष पुढे ! मी भक्तीचाच भुकेला आहे. म्हणून मुक्ती पेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. (समाप्त)©️

You cannot copy content of this page