Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सत् प्राप्तीचे गुह्य…! ©️

सत् प्राप्तीचे गुह्य…! ©️

श्री सद्बागुरु बाबा – मानवी मनाची वृत्ती निर्भीड असेल, तर तोच मानव मनावर ताबा ठेवू शकतो. वृत्ती ही त्रिकुटीच्या आधीन आहे. वृत्ती शुद्ध असेल तर कानाने तुम्ही शुद्ध ऐकाल, तुम्हाला शुद्धच ऐकू येईल. वृत्ती हीन असेल तर त्या ठिकाणी कधीही शुद्ध विचार येणार नाहीत. शुद्ध विचार आले नाहीत तर आपल्यात शुध्दत्वता येणार नाही. शुध्दत्वता आली नाही तर आपण सताला पाहू शकणार नाही. म्हणूनच आपले मन कसे हवे, तर शुद्ध स्फटिकासारखे !

सताच्या प्रकाशाचा पडदा केव्हा फाकला जातो? तर आपल्या सत् शुध्द वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. मन सूक्ष्माला सोडून नाही.” सूक्ष्म म्हणजेच आपणांत असणारा तो सताचा अंश !

मनाला शुद्ध ठेवायचे असेल तर प्रथम पायरी वृत्ती शुद्ध ठेवली पाहिजे. वृत्ती शुद्ध असेल तरच त्रिकुटी स्थिर राहील. कितीही उच्च पदाची ज्योत असली, पण जर कां त्याची वृत्ती हीन असेल, तर त्याच्याकडून काहीही होणार, काहिही घडणार नाही.

ज्याची वृत्ती सत् शुद्ध आहे, त्याला जगात कोणीही बनविणार नाही. वृत्ती जर शुद्ध नसेल तर मन केव्हाही स्थिर राहणार नाही. मन स्थिर राहिले नाही, तर सत् कदापिही प्राप्त होणार नाही.(समाप्त) ©️

You cannot copy content of this page