Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अवतार कार्य का घ्यावे लागते?©️

अवतार कार्य का घ्यावे लागते?©️

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात निमग्न असताना सुद्धा, त्यांना आपल्या कर्तव्यात निमग्न होऊ न देता, अघोर त्यांच्या कर्तव्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात, अशा वेळेला अवतार कार्य नटवावे लागते.

आत्ता असेच अवतार कार्य चालू आहे. याच शुभदिनी अवतार कार्य नटवून त्यांना मुक्त करण्यात आले. तो आजचा शुभदिन श्रेष्ठ दर्जाचा आहे. मानवाला ज्या वेळेला जन्माला घालण्यात येते, त्या वेळेला त्याचे कर्तव्य त्याच्याबरोबर देऊन टाकलेले असते. जन्माला आल्यानंतर त्याची प्रेरणा सत असते. पण तो असत का बनतो? तर षड्रिपूचे जे जाळे आहे, त्या जाळ्यात तो गुरुफटला जातो. त्याचा त्याला यत्किंचितही विचार नसतो. त्याला या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी हे अवतार कार्य आहे. त्याला यातून बाहेर काढल्यानंतर व सताची ओळख पटल्यानंतर, त्या सताला डोळे भरून पहाणे हे त्याचे कर्तव्य आहे. ©️

You cannot copy content of this page