Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

चैतन्य ! ©️

चैतन्य ! ©️

चैतन्य ! सर्व ठिकाणी भरून उरलेले, परात आहे त्याच्याही पलीकडे आहे. चरातही आहे आणि परातही आहे. सर्व ठिकाणी आहे. पाहणाऱ्याला पाहता येते, न पाहणाऱ्याला सापडत नाही. अशी ही चैतन्यमय स्थिती सेवेकरी अनुभवतात. इतर मानवांना त्याचा अनुभव नाही. अनुभवाशिवाय गोडी लागेल का? हेच जडत्व, ध्यानात लागल्यानंतर विसरले जाते. त्याला कशाचीही शुद्ध राहत नाही. चैतन्य ! सर्व ठिकाणी व्यापक आहे हे सेवेकऱ्यांनी पहावे. पुढील स्थिती मी सांगत नाही. त्याने स्वतः अनुभव घ्यावा. कानाने ऐकले ते अनुभवात किती उतरले? अनुभवाचे श्रुतीत किती उतरले? पापाचे संचित देहासी दंडना | तुज नारायणा दोष नाही ||

नारायण कसा आहे? हेच चैतन्य सर्व ठिकाणी व्यापक आहे. प्रकृत्तीला चेतना आहे. त्यालाच नारायण म्हणा. सद्गुरु म्हणा ! या आकाराला चिन्मय स्थिती नसेल तर त्या आकाराला काही किंमत आहे का? अर्थ आहे का? चैतन्यमय सर्व प्रकृतीत आहे, पण जे काही खोडसाळपणा करतात त्याना सांगणे. प्रकृतीकडून गुन्हे होतात ते नारायणामुळे होतात का? का चैतन्यामुळे होतात? का आणखी एक कशामुळे होतात? ज्या मानवाने नारायणाचा अंत घेतला नाही, कोणत्या स्थितीत काय आहे हे पाहिले नाही, त्या मानवाला माझी गती नाही. बरे, मानव काय म्हणणार आहे? काय करणार आहे? तो मानव म्हणतो, मीच सर्वस्व करतो. बालपणा नंतर तरुणपण येते. त्या भरात तो काय बोलेल, काय करील याचा अंत सापडत नाही. मग त्याची जबानी बदलल्यानंतर एकदम थकल्यानंतर काय होते? बालपण आणि म्हातारपण म्हणजे बालपणाची स्थिती. तिच स्थिती त्याची असते. म्हणजे म्हातारपणात त्याला प्रकृतीची शुद्धी राहात नाही. जवानीत काय केले, हे म्हातारपणात कळत नाही. ©️

You cannot copy content of this page