Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी
भगवान महाराज ट्रस्ट

5

What's New?

या सताला पाहण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरु हा राजमार्ग आहे. त्या मार्गाने, सर्वस्व आपली कर्तव्ये सांभाळून गेला, तर जन्माला आल्याचे सार्थक होते. …

अवतार कार्य का घ्यावे लागते? याचा पूर्णत्वाने उहापोह केलेला आहे. ज्या वेळेला भूतलावर अराजकता माजते, महान महान ऋषी मुनीं, हे आपापल्या कर्तव्यात …

संदेश हे संक्रमण होणारच आहे. त्याशिवाय भूतलावर सत्य, असत्य किती आहे हे सांगता येणार नाही. असत्याने आपला कितपत पगडा टाकला आहे व …

श्रीकृष्ण जयंती संदेश ©️

श्रीकृष्ण जयंती संदेश ©️

श्री समर्थ मालिक – त्यावेळचा काळ आणि आत्ताचा काळ यात बराच फरक आहे. त्या काळामध्ये जसा सेवेकरी बोलत होता, त्याप्रमाणे त्याचे कर्तव्य होत होते. त्याप्रमाणे वागत होते, पण आत्ताच्या सेवेकऱ्यांचे बोलणे जास्त पण कृती कमी अशी तऱ्हा आहे.

याचे कारण काय? हल्लीचा काळ, हवामान हे तशा तऱ्हेचे आहे, म्हणून प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात अंतर हे असे आहे. म्हणून त्यांना घेता येत नाही. त्याच्या मनाची भावना द्वैत असल्याकारणाने सेवेकरी कृतिमान होत नाही. होऊ शकत नाही. मनाची भावना चंचल झाल्याकारणाने कृतीही चंचल होते. त्यामुळे साध्य साधत नाही.

तरी पण कुठेही लांब जाण्याची आवश्यकता नाही. अरण्यात जाऊन तपश्चर्या करण्याची आवश्यकता नाही. योग साधनेची आवश्यकता नाही. साधीसुधी भक्ती करून मला डोळे भरून पाहणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. सरळ सत् शुध्द, साधी सोपी भक्ती करून मला पाहण्याचा प्रयत्न करा.

दुसरी गोष्ट, हल्लीचे दिवस फार कठीण आहेत. त्यामुळे सेवेकऱ्यांची मनें चलबिचल झाली आहेत. पर्जन्य पडत नाही, तरी त्याला त्या तऱ्हेचे संदेश आहेत. मानवी तऱ्हेने शासनाचे कर्तव्य अन आर्थिक बाबतीत मनें चलबिचल आहेत. त्याकडे लक्ष असल्यानंतर ध्यानधारणेसाठी थोडीशी बगल दिली जाते.

एकचित्तता साधण्यासाठी त्याचे मन संशय रहित व्हायला पाहिजे. तेव्हाच एकचित्तता साधते. म्हणून एकचित्तता साधायची असेल तर मन कल्पना, संशय रहित करून मायेला थोडीशी बगल दिली पाहिजे. जडत्वाला विसरले पाहिजे. म्हणजेच एकचित्तता साधते.

या ठिकाणी आसनाचे सानिध्यात काय चालते, हे सेवेकऱ्यांना माहित आहे. त्याचा त्यांना अनुभव आहे. या मार्गात गुंतला, या मार्गाने जाऊ लागला तेव्हाच ही गती माहीत होते. सेवेकरी म्हणा, भक्त म्हणा याचे बोलणे जास्त, पण कृती कमी अशा तऱ्हेची गती असू नये.

इतकेच काय, एवढे सुद्धा भान राहत नाही कि मी हे कोणाच्या कृपेने करीत आहे? त्याचा मनाची समजूत होते कि मी कोणीतरी विशेष आहे. त्याचे जर मला भान असेल तर बोल घेवडेपणा कमी करेल. (पुढे सुरु…२) ©️

You cannot copy content of this page