Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सतच आपणास सोडविते ©️

सतच आपणास सोडविते ©️

शकुंतला – स्थूलातील प्रत्येक ज्योतीला सुख दुःख संसार असतो. परंतु संसारात प्रत्येकाला सुख पाहिजे असते. सध्याच्या मानवाला संसारात सुखच आहे. त्या अरण्यातील भयंकर श्वापदे, वाघ, सिंह यांची आठवण झाल्यानंतर विचित्र स्थिती निर्माण होते. त्यावेळेला इतके अतोनात कष्ट काढले, दुःख भोगले, तरी प्रत्यक्ष पित्याला दया आली नाही. ज्या ठिकाणी असत, त्या ठिकाणी आदर तरी कां द्यावा?

कर्तव्याच्या ठिकाणी मायावी नाते नाही. त्यांना आदर द्यावा पण तो कोणत्या वेळी? प्रत्यक्ष सद्गुरुना बनविणे महान अघोरी चूक आहे. अनेक जन्म घेतले तरी, क्षमा होणे कठीण. पूर्वी अशी गती होती. पिता माता कोणी असो, सताच्या बाहेर गेल्यानंतर महान शिक्षा होत असे. कण्वमुनींच्या आश्रमात सुख होते. पण अरण्यवास भोगताना सर्वस्व दुःख आठवले. अनुभवले. परंतु परम् दयाघन माऊलीने सर्व दुःखातून पूर्णत्वाने सुटका केली. (समाप्त)©️

You cannot copy content of this page