Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मऊ मेणाहूनी आम्ही -२-©️

मऊ मेणाहूनी आम्ही -२-©️

तुकोबाला विश्वास होता, किती जरी त्रास झाला तरी त्याने आपल्या कर्तव्याला पाठ दिली का? तो आपल्या नादातच होता. कधी संपत्तीला भाळला होता का? धनद्रव्याला लुब्ध झाला होता का? कां झाला नव्हता? पण ती ज्योत कधी उपाशी राहिली होती का? मेणाहूनी मऊ, कापसापेक्षाही मऊ असा सेवेकरी होईल, त्यावेळी त्याला कळेल. जो मेणापेक्षाही मऊ सेवेकरी आहे, त्यालाच हे कळेल. ती ज्योत त्या पात्रतेची होती. आपण त्या पात्रतेचा बनण्याचा प्रयत्न करा. पण हे एकदाच होत नसते.

बहुत सुकृतांची जोडी ! बहुत जन्मींचे सत् संचित साठल्यानंतर एवढी पात्रता निर्माण होते. एवढेच की, त्या तुकोबाला किती वेळा जन्म घ्यावा लागला असेल, किती वेळा मानवात पाठवावे लागले असेल, तेव्हाच ती ज्योत शुद्ध स्फटिका सारखी झाली. आता ती ज्योत कोठे आहे?

समर्थ केव्हा आपणात सामावून घेतात? समर्थमय बनेल व त्याचे कर्तव्य संपेल तेव्हाच ते त्या ज्योतीला सामावून घेतात. समर्थ त्यांचे कर्तव्य बघत असतात. जराही काळा डाग दिसणार नाही अशी पात्रता येईल तेव्हाच ते त्याला आपणात सामावून घेतात. तेव्हा सेवेकऱ्यांनी मायेला बगल देण्याचा प्रयत्न करावा. तदनंतर सर्वस्व होईल. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page