Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सत् सेवा – भाग तीन ©️

सत् सेवा – भाग तीन ©️

त्याने (एकलव्याने) प्रतिमा जागृत केली. त्याच्यात अफाट गुरुभक्ति निर्माण झाली आणि तो एक आदर्श सेवेकरी झाला. त्याप्रमाणे व्हावयास पाहिजे. त्याने अहोरात्र काबाडकष्ट करून, विद्या संपादन केली. त्याने सद्गुरू मुखातून अमोल बोल आल्यामुळे हे केले. सत सेवेसाठी सत् सेवेकरी आपल्या प्राणाचीही पर्वा करीत नाही. अंगठा घेऊन काय करावयाचे होते? पण द्रोणाचार्यांना सत् किती आहे, हे पहावयाचे होते. ज्ञानाचा एकही बोल पाजलेला नसताना, एवढा माझ्यात रममाण झाला, पण सत पदाला किती चिकटलेला आहे, हे त्यांनी पाहिले. तो एकलव्य अमर झाला आहे. तसेच सेवेकरीही त्या पदाचे पाहिजेत.

सत्पदाच्या सेवेकऱ्याचा मान फार मोठा आहे. लहान मोठा, गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा येथे भेदभाव नाही. सर्व समान आहेत. तो या ठिकाणी लिन झाला पाहिजे. ज्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने लिनता आहे, तो सेवेकरी चुकत नाही. लिनत्वावर सेवेकरी सत् पदाला गेलेले आहेत. असे या ठिकाणी आहेत व काही घसरलेले पण आहेत. साधे, सोपे आणि सुलभ असे हे आसन आहे. याचे आपण सेवेकरी आहात.

सेवेकरी चुकतात का? कारण मूल जन्माला आल्यानंतर बालस्वरूप ब्रह्मपद असते. पण ज्या वेळेला कलियुगाचा स्पर्श होतो, वारा लागतो, त्यावेळेला त्याचे ब्रह्मपद जरी अखंड असले, तरी चंचल गती निर्माण होते. त्याचप्रमाणे अनुग्रहाच्या वेळी बालगतीप्रमाणे तो लीन होतो. त्यावेळेला आत बाहेर काहीही नसते. पण बाहेरचा वारा लागला की, तो चुकतो. मग सद्गुरु काय करतात? सेवेकरी षड्रिपूत गुरफटला असताना, सद्गुरु आपल्या मुखातून बोल फेकतात व त्याप्रमाणे तो मुक्त होतो. पण मनाच्या तरंगात गुरफटतो, विसरतो व चुकतो. मग सद्गुरु तत्त्व हेलावते. अंत:करण शुद्ध असते. त्यांची एकच भावना असते की माझा सेवेकरी सतशुद्ध गतीने जाऊन या चरणांवर लिन झाला पाहिजे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page