Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सांभाळी कनक आणि कांता! ©️

सांभाळी कनक आणि कांता! ©️

स्थुलाला स्थुलाची आवश्यकता आहे. सत् आहे. स्थुल हे माया रहीत नाही. पण माये मध्ये दोन शाखा आहेत – १) सत् आणि २) असत !

मानव धनाला भुलतो. पण ज्याने कनक आणि कांता सांभाळली तोच मोक्षाचे मार्गाने जाऊ शकतो. संतांनी सांगितले, धन म्हणजे संपत्ती ! मग स्थावर असो वा जंगम असो. म्हणून सेवेकर्‍यांनी धनासाठी मोहवश व्हावयाचे नाही. धनासाठी मी नाही. माझ्यासाठी धन आहे.

आपण जन्माला येतो त्यावेळेला सत् संचित अगर असत संचित बरोबर घेऊन येतो. जन्माला आला त्या वेळेला अदृश्य धन बरोबर येते. सत् संचिताने चांगली गती मिळते, तर असत संचिताने अघोर गती मिळते. परब्रम्हाचा याच्याशी काहीही संबंध नाही. जड तत्व मनाच्या आहारी जाते. यामुळे मन हे मोहवश होते. म्हणून सेवेकऱ्याने मोहवश व्हावयाचे नाही.

स्थुलांगी मनुष्याजवळ दोन पैसे नाहीत तर त्याला दुकानदार उभा करणार नाही. धनाचा जो मोहवश झाला, त्याला धन फसविते. “मी धनासाठी नाही, तर धन माझ्यासाठी आहे” ही धारणा पाहिजे.

लक्षात ठेवा, मी प्रथमच सांगितले, स्थुलाला स्थुलाची आवश्यकता आहे.” जरी मायेचा पसारा आहे, तरी हे कर्तव्य आहे. मायेचा आशक होता कामा नये. म्हणून मोहवश होणे ही चूक आहे. जो सताच्या चाकोरीतून जाण्याच्या मार्गात आहे, तो शक्यतो धनाची किंमत शून्य समजतो. पण धन हटकून त्याच्या पाठीमागे येते. जो धनाच्या पाठीमागे लागतो, त्याच्यापासून धन दूर पळते.

स्थुलासाठी स्थुलाची आवश्यकता आहे. पण त्या ठिकाणी आशक मात्र होऊ नये. म्हणून मुख्य जे आहे ते धन आहे. कनक आणि कांता मालकांनीच प्रसवलेले आहे. जे संत महात्मे होऊन गेले, ते धनाच्या पाठीमागे लागले होते कां? मानव कधी दुःख मागतो कां? पण कुंतीने श्रीकृष्णा जवळ सुख मागितले का? भर्तृहरी सारखे अवतारी पुरुष मोहवश झाले तर तुमची आमची काय अवस्था आहे?

स्थुलाला धनाची आवश्यकता आहे. पण सूक्ष्मात गेल्यानंतर धनाची आवश्यकता नाही. स्थुल सूक्ष्माला धरू शकत नाही. म्हणून धन लोभी होऊ नका. धन आपल्या पाठीमागे आले पाहिजे. म्हणून भावना नि:ष्काम ठेवा. सकाम ठेवू नका. भगवंताने प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाला धन दिलेले आहे. कोणाच्या नशिबात श्रीखंड असेल तर कोणाच्या नशिबात कोंडा असेल. पण हे सर्व प्रकारचे खेळ आहेत. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page