Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

….पापाचे खंडन होईल का?©️

….पापाचे खंडन होईल का?©️

श्री विठ्ठल – साधा भोळा चोख्या, तो कुठे तीर्थ करायला गेला होता? त्याने लिखाण केले आहे ना? तो बराच शिकलेला होता का? मग आता शिकलेल्यांनी सांगा, आताचे भक्त कसे आहेत? तुकोबाने, जनाने, नामदेवाने कोणत्या तऱ्हेने भक्ती केली?

पापाचे घडे कसे धुतले जातात? तर नामानेच जातात ना ! याचे संतांनी वर्णन केले आहे. एकाच नामाने अनंत जन्मीच्या पापाचे खंडन होते. पण त्याला ज्योत कोणत्या तऱ्हेची पाहिजे? नामस्मरण करतो आहे. पण हजार धंदे चालू. मग त्याच्या पापाचे खंडन होईल का? केव्हाही होणार नाही. मग त्याची भावना जरी असली तरी तत्त्वाचे ठिकाणी रुजू नसते.

आवडीने भाळी लावले टिळे | परी तुझ्या चरणी रविंद्र न लोळे || दर्शन झाले की, मुक्ती मोक्षाला हात घातला का? यांना माया बनविते. आम्ही त्या ठिकाणी चूप असतो. हे माझे भक्त आहेत, असे म्हणणे सुद्धा माझा गुन्हा होतो. मी अशा संतांना भक्तसुद्धा म्हणू शकत नाही. समर्थांचा म्हणा अगर माझा म्हणा जो भक्त असेल, तो कुठेही जाणार नाही. आम्हाला त्याचे ठिकाणी धाव घ्यावी लागते.

आता दुसरी गोष्ट, तुळस म्हणजे काय? महान पवित्र तत्व आहे ते ! त्याची माळ हातात घेऊन जप करावयाचे. तिला हातात घेऊन वाटेल ते करावयाचे. तिला तरी त्यातून मोकळी करा. तिला हातात घेऊन, चोऱ्या, माऱ्या, लबाड्या करतात. जितके माळवाले आहेत, त्यांना परमेश्वराचे नाव माहित नाही म्हणून घालतात येरझारा. पूर्वीचे संत निष्काम गतीने गेले. त्यांची कृती पाहून मूर्तीला पान्हा फुटला. म्हणजे मूर्ती प्रवेश घेऊन पान्हा फुटतो, पण भावी भक्त तिथे गेला तर ! (समाप्त)©️

You cannot copy content of this page