Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

….पापाचे खंडन होईल का?©️

….पापाचे खंडन होईल का?©️

श्री विठ्ठल – साधा भोळा चोख्या, तो कुठे तीर्थ करायला गेला होता? त्याने लिखाण केले आहे ना? तो बराच शिकलेला होता का? मग आता शिकलेल्यांनी सांगा, आताचे भक्त कसे आहेत? तुकोबाने, जनाने, नामदेवाने कोणत्या तऱ्हेने भक्ती केली?

पापाचे घडे कसे धुतले जातात? तर नामानेच जातात ना ! याचे संतांनी वर्णन केले आहे. एकाच नामाने अनंत जन्मीच्या पापाचे खंडन होते. पण त्याला ज्योत कोणत्या तऱ्हेची पाहिजे? नामस्मरण करतो आहे. पण हजार धंदे चालू. मग त्याच्या पापाचे खंडन होईल का? केव्हाही होणार नाही. मग त्याची भावना जरी असली तरी तत्त्वाचे ठिकाणी रुजू नसते.

आवडीने भाळी लावले टिळे | परी तुझ्या चरणी रविंद्र न लोळे || दर्शन झाले की, मुक्ती मोक्षाला हात घातला का? यांना माया बनविते. आम्ही त्या ठिकाणी चूप असतो. हे माझे भक्त आहेत, असे म्हणणे सुद्धा माझा गुन्हा होतो. मी अशा संतांना भक्तसुद्धा म्हणू शकत नाही. समर्थांचा म्हणा अगर माझा म्हणा जो भक्त असेल, तो कुठेही जाणार नाही. आम्हाला त्याचे ठिकाणी धाव घ्यावी लागते.

आता दुसरी गोष्ट, तुळस म्हणजे काय? महान पवित्र तत्व आहे ते ! त्याची माळ हातात घेऊन जप करावयाचे. तिला हातात घेऊन वाटेल ते करावयाचे. तिला तरी त्यातून मोकळी करा. तिला हातात घेऊन, चोऱ्या, माऱ्या, लबाड्या करतात. जितके माळवाले आहेत, त्यांना परमेश्वराचे नाव माहित नाही म्हणून घालतात येरझारा. पूर्वीचे संत निष्काम गतीने गेले. त्यांची कृती पाहून मूर्तीला पान्हा फुटला. म्हणजे मूर्ती प्रवेश घेऊन पान्हा फुटतो, पण भावी भक्त तिथे गेला तर ! (समाप्त)©️

You cannot copy content of this page