Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

भक्ति – साधी आणि सोपी – (३)©️

भक्ति – साधी आणि सोपी – (३)©️

सद्गुरू सांगतात वाम मार्गाने जाऊ नकोस. ते सेवेकरी ऐकत नाही. अविनाशी आत्मा काय करणार? तो स्व:मायेच्या कवचाच्या आंत दडला आहे. सेवेकरी काय करतो, हे सर्व त्याला माहित असते. सद्गुरू सांगतात ते थोडे तरी लक्षात ठेवले तरी फायदाच होईल. आपल्या ज्या इतर मायावी ज्योती बरबटलेल्या आहेत, ते काय करणार? जे आपले गुरु तेच शेवटपर्यंत पुरतील. आपले मायावी आईवडील शेवटपर्यंत (पुरणार) नाहीत. आपले सद्गुरू हेच सर्वस्व आहेत. तेच शेवटपर्यंत पुरतील. चूक झाली तर शेवटी सद्गुरूंना दया येते. सद्गुरू त्यांच्या हाकेला धावतात. मानव म्हणेल तो मरतो आहे, तर मरू द्या. मालिक तसे म्हणणार नाहीत. तो जरी चूकत असेल, तर सद्गुरू चूकू देत नाहीत. सांभाळून घेतात. थोडीशी शिक्षा देतात. ते कशाकरीता? तर, त्याला वळणावर आणण्यासाठी. सगेसोयरे फक्त पैशासाठी धडपडतात. सद्गुरूना एकच तहान असते, (सेवेकरी सन्मार्गाने जावा.) 

सेवेकरी सत् मार्गाने नामस्मरण करील तेच सत् होते. सेवेकरी करोत न करोत सद्गुरू त्याला तारीतच असतात. ज्याला अविनाशी आत्मा म्हणतात, त्यांचा अंत घेणे सोपे आहे. मात्र घालून दिलेल्या वळणाने जावयास पाहिजे, म्हणजे ठाव मिळेल. अविनाशी आत्मा अनाठायी जाणार नाही. सद्गुरू प्रतच जाईल. (पुढे सुरु….३)©️

You cannot copy content of this page