Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

शरण ©️

मानवाची अशी इच्छा आहे की आम्हीं शरण आहोत.

कशाकरीता शरण आहोत? कोणाला शरण आहोत?

कोणाला ईश्र्वर पहाण्याची इच्छा असते, तर कोणाला धनसंपदा मिळविण्याची इच्छा असते, कोणाला संपत्ती मिळविण्याचा उद्देश असतो, अशी प्रत्येकाचीच इच्छा वेगवेगळी असते.

कोण म्हणतं मला मुल पाहिजे, कोण म्हणतं, देवा मला सुखी ठेवा, तर कुणाची इच्छा असते मला संपत्ती पाहिजे, तर कुणी म्हणतं मी आरामशीर बसून खावे. पण यांच्यातून जो निष्काम भक्ती करील, तो मात्र आपल्या आयुष्याचं कोट कल्याण करुन घेईल.

ईश्वर कोठे आहे?

कित्येकांच्या मनाचा भ्रम असा होतो की, आम्हीं शरण आहोत, गुरू व आम्ही सारखे आहोत. त्यांना ईश्वर कसे म्हणू? त्यांना ईश्वर म्हणता येत नाही. ते ईश्वर नाहीत.

म्हणूनच म्हटले आहे की, त्या ठिकाणची ओळख नाही, तर ईश्वर कसा बरे सापडेल? मग शरण येऊन काय उपयोग? तुम्ही कोणाला शरण आलात? याच्यात अर्थ नाही. म्हणूनच कित्येकांना गुरू हे काय आहेत, याची जाणीव नाही आणि जर का जाणीव असती, तर लोक संशयात गुरफटले नसते आणि हजारो रस्त्यांनी फिरले नसते. ©️

You cannot copy content of this page