Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

भक्ती करावी नेटकी…©️

भक्ती करावी नेटकी…©️

श्री समर्थ मालिक – भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे, पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे, पण ते त्यांच्या हातून होत नाही म्हणून सेवेकरी फसतो. वाट चुकल्यानंतर त्याला ठेचा लागतात. मग त्यात दोष कोणाचा आहे?

दरबारात आपण विचारणा केली होती,“प्रेमसूत्र नेतो तिकडे जातो श्री हरी”, मग या दरबारात एका छायेखाली असलेल्या सेवेकऱ्यांचे प्रेम फार उतू चालले आहे असे आहे का? मग मी कोणत्या सेवेकर्‍याकडे वळावे? या ठिकाणचे सेवेकरी एकाच प्रेमसूत्रात आहेत का?

अजूनही वेळ गेलेली नाही. भक्ती प्रेमात निमग्न होण्याचा प्रयत्न करा. एकाच पित्याची तुम्ही लेकरे आहात हे ध्यानात ठेवा. या सृष्टीतील सर्व लेकरे जरी त्यांची असली तरी काही जण ते दूर का अन् तुम्ही सानिध्यात का? अजून विचार करा. इतकेही करून सर्वस्व गंगेत वाहिल्या सारखे होईल. ©️

You cannot copy content of this page