Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सत कर्तव्याने वाटचाल करा…©️

सत कर्तव्याने वाटचाल करा…©️

श्री समर्थ मालिक – एका सेवेकऱ्याचे पत्राद्वारे संदेश काय येतात, त्याला तुम्ही हसता हे बरोबर दिसते का? एखाद्याला वाईट वाटेल असे बोलता, कधी कुणी चेष्टा-मस्करी करतात, कधी कधी कुणी पायरी सोडून वागतात हे कितपत योग्य आहे? ह्याचा विचार करा.

आसन जागे नाही झोपले आहे असे आपण समजता का? हा दरबार हसण्याचा आहे का? हसत होता मग मुख्य ज्योतीने रोखले का नाही? ज्या सद्गुरुंना तुम्ही शरण आहात, ते आपमतलबी आहेत का? मग का हसलात? ही प्रेम सूत्राची दोरी कोण कुणीकडे नेतो? नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे ! 

अशा या सेवेकऱ्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. इतकेच मला सांगावयाचे, की सत कर्तव्याने जी ज्योत जाईल तिच फळ चाखील. जी जाणार नाही, त्याच्या सारखा अभागी तोच ! मला या सेवेकऱ्यांबद्दल नाराजी वाटते. छाया काढून घेतली तर मग समजेल काय ते ! मग काहीच राहणार नाही. कोठे काय होईल हेच कळणार नाही. सेवेकरी फार मायावी आहेत असे आम्ही म्हणावे कां? ©️

You cannot copy content of this page