Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

वेळ आली म्हणजे खेळ दिसेल…©️

वेळ आली म्हणजे खेळ दिसेल…©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी म्हणा, भक्त म्हणा याचे बोलणे जास्त, पण कृती कमी अशा तऱ्हेची गती असू नये. इतकेच काय, त्यांना एवढे सुद्धा भान राहत नाही कि मी हे कोणाच्या कृपेने करीत आहे? त्याचा मनाची समजूत होते कि मी कोणीतरी विशेष आहे. याचे जर त्याला भान असेल तर बोल घेवडेपणा कमी करेल. दुसरी गोष्ट, सेवेकरी ठाम आहेत खरे आहे. जे होणार आहे ते कधीही चुकणार नाही. जी घडण घडणार असेल, ती घडल्याशिवाय राहणार नाही.

याभूमीमध्ये अघोर, आपमतलबी, वाईट वर्तणूक, गरीबांकडे दुर्लक्ष, स्वतःचा स्वार्थ साधूपणा याला ऊत आलेला आहे. या अघोरांनी जास्त थैमान घातलेले आहे. याची घुसळण केल्याशिवाय काही होणार नाही. या मानवांकडून काहीतरी पाप घडल्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून हे असे होत आहे. ते पूर्ण झालेले नाही म्हणून हात घालता येत नाही. शिशुपाळाचे १०१ अपराध घडले. आताच्या काळात १०१ व्हायला नकोत, मग विलंब लागणार नाही.

आता काळ नजीक आलेला आहे. पुढे काय होणार हे मी सांगत नाही अन् सांगणारही नाही. आपण पाहत राहणे. कृष्णाने कंसाशी तसेच इतर अघोर मानवांची जसी घुसळण केली त्याच तऱ्हेची गती आता होणार आहे. नैसर्गिक गतीकडून ते करून घेणार आहे. त्याचप्रमाणे मानवी कृती कडूनही घुसळण होणार आहे. आपल्या दृष्टीसमोर सर्वस्व खेळ असेलच. मानव कसा चालला आहे हे आपण पाहतच आहात. आपण मागे म्हणत होता, बिचारे पशुपक्षी यांनी काय केले आहे? परंतु पशुपक्षी यांचे जरी हाल झाले तरी त्यांना देहात कुठपर्यंत ठेवायचे? त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने मोकळीकता करावयास हवी. अदृष्य शुद्धीकरण जे आहे ते थोडेसे आहे. ©️

You cannot copy content of this page