श्री समर्थ मालिक – सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. तो सात्विक असतो, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकतो. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करिता चुणूक दाखवावी लागते.
या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात? पण रममाण कोणाला करून घ्यावयाचे आणि कोणाला नाही?
हिच स्थिती कोकण आश्रमात झालेली आहे. तेथील मानव मतलब साधण्यासाठीच सेवेकरी झालेले आहेत. फक्त एकच ज्योत सोडून बाकी ज्योती जागृत आहेत का? काही मुंबईत आता का आल्या त्याची कल्पना आहे. ज्या कर्तव्यासाठी संदेश सोडले, त्या कर्तव्याचे पालन झाले आहे का? मानवी पुराव्यासाठी मला तिकडे जावे लागेल. म्हणूनच ते इकडे आलेले आहेत. ©️
