Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

प्रबोध सताचा…©️

प्रबोध सताचा…©️

हल्लीच्या सेवेकर्‍यांना विशेष वाटते ते कसे? प्रथम त्या ठिकाणी चमत्कार पहावयास मिळाले, आता ते होत नाहीत. पण सेवेकरी म्हणतात, काहीतरी करा. इतकेच सांगत आहे की, कर्तव्य होईल पण थोडा अवधी आहे. धीर धरा. माझ्या सताला, सद्गुरुंना आम्ही ज्या प्रकृतीला शरण आहोत, त्यांना त्रास होऊ नये, ही इच्छा आहे. पण तुम्ही एकच, ठाम असाल तर ते कर्तव्य आपोआप होईल. चिंता नको.

अखंड तत्व कोठे आहे, त्याचा वावर कोठे आहे, हे आपणाला कळलेच असेल. सेवेकऱ्यांनो ठाम श्रद्धा, अढळ विश्वास, दृढ: निश्चय असल्यास सर्वस्व होते. डळमळीत असल्यास काही होणार नाही. म्हणून ठाम व अखंड श्रद्धा ठेवा. वाट भुलता कामाची नाही हे सेवेकर्‍यांनी ओळखले पाहिजे.

त्या ठिकाणी काहींची मनोभावना आहे, पूर्वी होते पण आता काही नाही. पण या ठिकाणी हे ठाम आहेत. याची कल्पना इतर मानवांना नाही. आजच्या या बोलावरून काय आहे ते पहा अन् त्याप्रमाणे वाटचाल करा. भुलू नका. शंका धरू नका. सत् भक्तीला ऋध्दी सिद्धी, तंत्र मंत्र काही लागत नाही. जादूटोण्याची आवश्यकता नाही. आले आले अन् गेले गेले हे सत् भक्तीत नाही. नजरबंदीचे खेळ नाहीत. अघोर मानवाच्या कर्तव्याचे फळ अस्थिर असते. तेच त्यांना मिळते. पुढे काय करायचे ते व्यापक शक्तीच करते. ते मानवांच्या हातात नाही.

सेवेकऱ्यांनो, हे तुमचे अखंड नाम अमृतासारखे टिकविण्याचा प्रयत्न करा. हेच माझे संदेश आहेत. पूर्वीप्रमाणे आता कस नाही. अहंकार हा आज ना उद्या मला खतम करावाच लागतो. क्रोधाला मारावयाचे, एका क्षणात मारू शकतो, पण त्याच्या पायऱ्या आहेत. मानव अहंकाराने बरबटला तर तोच अहंकार त्याला मृत्यूच्या खाईत लोटतो. तो लोटला जातो. ते कसे होते, तर करून घ्यावे लागते. करून घेतल्यानंतर तो आपोआप त्या खाईत लोटला जातो. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page