Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

देवाचे सख्यत्वासाठी | ©️

देवाचे सख्यत्वासाठी | ©️

श्री समर्थ मालिक – देवाचे सख्यत्वासाठी | पडाव्या जिवलगांसी तुटी ||सर्व अर्पावे शेवटी | प्राण तोही वेचावा || (दास.४.८.८)

एकाच्याच ध्यानासाठी, एकाच्याच नामासाठी, एकाच्याच सख्यत्वासाठी ते कसे करावयाचे? त्यांना आपलेसे कसे करावयाचे? हे जर सापडले, तर हेवेदावे, मदमस्तर निर्माण होईल का? एकाच तत्त्वावर ठाम राहिला तर भटकण्याची आवश्यकता काय? ज्योतिष, राशिभविष्य पाहण्याची काय आवश्यकता?

एका समर्थांच्या ठिकाणी दृढ: भाव, ठाम श्रद्धा वाहिल्यानंतर बाकी काही उरेल का? एकाचे सख्यत्वासाठी सर्वस्व अर्पण केल्यानंतर, मन दुसरीकडे धावणार नाही, जाणार नाही. वर्मच पाहिल्यानंतर त्याचे मन दुसरीकडे जाणार नाही. मग मात्र प्राण त्या ठिकाणी अर्पण केलेला दिसून येतो. दृढ:निश्चय, ठाम श्रद्धा, यामुळे त्याचा प्राण अगोदरच अर्पण केलेला असतो. बरं, प्राण अर्पण केलेला आहे हे कशावरून ओळखायचे? प्राण अर्पण केला आहे असे म्हटले म्हणजे होते का? प्राण अर्पण केलेल्याची भावना ओळखून येते. असेच जर असेल तर इतर मानवांना कळून येते. तेव्हा तन मन धन हे सर्वच व त्याने अर्पण केल्यानंतर मग बाकी उरले काय? आता ही तिन्ही तत्त्वे कशावर चालली आहेत? कोणाच्या सत्तेने चालली आहेत? ©️

You cannot copy content of this page