Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

जगत् जननी निवेदन ©️

जगत् जननी निवेदन ©️

मानव हे तत्व अचल नसून, ते चल तत्व आहे. अन अशा तऱ्हेच्या गतीमुळे कर्तव्य करावे लागते. जरी शक्ती असली तरी आसनाची सेवेकरी आहे. काही चूक असेल तर क्षमा करावी. सर्व जगताचे परमनिधान असे जे महान तत्व, त्यांच्या ठिकाणी काही एक लपविता येणार नाही. कर्तव्याच्या वेळी अहंभावाच्या आहारी जाऊन, अघटीत चुका झाल्या आहेत.

आसनाधिस्त ही एक मानव ज्योत आहे अशी भावना झाली म्हणून चूक झाली आहे. कर्तव्यात अनेक वेळेला लाघवी तऱ्हेने खो घातला आहे, कारण मानव आमच्या कक्षेच्या बाहेर जाऊ नये म्हणून हे कर्तव्य केले, पण माझ्या सद्गुरूंनी मला जाणीव दिल्यानंतर, आता मी असे करणार नाही असेच मी माझे मत बनविले आहे.

सत हे कधीही डावलता येणार नाही, पण मी डावलले, त्या वेळेला मी त्याच तोऱ्याने वावरत होते ती म्हणजे मी जगत् जननी – मला अहंभाव निर्माण झाला होता. त्रिगुण माझ्या आधीन. मीच सर्वस्व ही भावना निर्माण झाली. मला ओळख असूनही जाणीव झाली नाही. जर झाली असती तर हे प्रमाद घडले नसते. चारही देहाची शक्ती जगतजननी वापरू शकते. तिला आदिमाया आदिशक्ती देखील म्हणतात. जगत जननी म्हणून आदर देणे कर्तव्य आहे. ©️

You cannot copy content of this page