Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

गुरु बंधूत्वाचे नाते कसे असावे? ©️

गुरु बंधूत्वाचे नाते कसे असावे? ©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरू ज्ञान देतात. ज्ञान सर्वांना दिलेले आहे, बहाल केलेले आहे. ते जतन करून, त्याची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु ते सांभाळता येत नाही, त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. तरी सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे.

मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? मायेच्या रहित कोणीही नाही, तरी सुद्धा सेवेकऱ्यांनी मोह मायेच्या अधीन जाता कामा नये. आपल्या सद्गुरुंचे आदेश, संदेश पाळून त्या दिशेने सेवेकरी राहिल, तर सत् त्याच्यापासून दूर राहणार नाही.

“सेवेकऱ्याने माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी करतो काय अन् मी काय केले पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार केला पाहिजे. भंडार भरलेला आहे, पण लुटणारा पाहिजे.” तसेच “प्रेम सूत्र दोरी अशी बांधिली पाहिजे की एकाच जीवात, एकाच रज्जूत आपणांस डुंबून जाता आले पाहिजे. हेवेदावे, मनाचा कलुषितपणा, कुणाही गुरु बंधू भगिनींना नाराज न करणे हे आपण अंगिकारले पाहिजे. अशीच मनाची ठेवण प्रत्येक सेवेकऱ्याने ठेवली पाहिजे.”

येथून पुढे कुणीही कोणाची मनें दुखवू नका. एकमेकांशी वागताना, एकमेकांशी बोलताना आपण कसे वागतो, आपण कसे बोलतो ह्याचे भान ठेवूनच आपली वाटचाल ठेवावी. आश्रमात किंवा दरबारात असताना स्थानाचे भान राखूनच आपली कृती ठेवावी.

गुरु बंधूत्वाचे नाते फार श्रेष्ठ आहे याचे सगळ्यांनी भान ठेवावयास हवे आणि त्या प्रमाणे वागावयास हवे.©️

You cannot copy content of this page