Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो…©️

आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो…©️

गीतेत म्हटले आहे, “मन्नाथो श्री जगन्नाथो | मद् गुरु श्री जगद्गुरु || सर्वात्मा सर्व भूतात्मा | तस्मै श्री गुरुवे नमः || मग माझा वेगळा, त्याचा वेगळा असे होईल का? प्रकृती वेगळी असल्याकारणाने विशेष काही वाटते, म्हणून आकार निरनिराळा आहे आणि आकार हाच निराकारापर्यंत पोहचवू शकतो.

मानवांना हे समजत नाही. पण बोल आणि प्रणव कोणत्या तऱ्हेत येतात? हे कसे काय आहे, हे जाणणारे जाणतात. ज्याच्या संचितात आहे, तोच घेऊ शकतो. ज्याच्या संचितात नाही तो त्यात रमणार नाही. जी प्रकृती मायेच्या आधीन बनली त्याला त्याच तऱ्हेने वाट दाखवावी लागते. ज्याला सताची आपुलकी आहे, त्याला त्याच तऱ्हेने वाट दाखवतात. इतकेच, सर्वस्व मोक्षापर्यंत दाखविण्याचे सामर्थ्य आकारातच आहे. ज्याच्याजवळ साध्य नाही, सामर्थ्य नाही, तो सेवेकर्‍याला काय दाखविणार? ©️

You cannot copy content of this page