Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

अतिसूक्ष्म कोण आहे ? ©️

अतिसूक्ष्म कोण आहे ? ©️

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच कर्तव्य झाले आहे. आहे ना कल्पना?(आहे.)

प्रत्येक अवतार कार्यात महान महान मुनिजन झाले. सता आपल्या सानिध्यात कोण आहेत? परमपूज्य गुरुदेव महामुनी वशिष्ठ, पण सता, आपणास कल्पना आहे, प्रत्येक अवतार कार्यात आपले गुरूपद कोणी नटविले? गुरुदेव वशिष्ठांनी, पण सता कधी उच्च प्रणव दिधले का? नाही. कोमल शांत असेच प्रणव दिधले. या मुनीजनांची बरोबरी कोण करू शकेल?

सता, राम अवतारात आपण विश्वामित्राची पूर्ण शक्ती घेतली अन कलियुगी अवतारकार्यात पूर्णत्व नष्ट केले. सता, हेच संदेश आहेत. सता आपल्या सानिध्यातील कलियुगीन कर्तव्य ज्यावेळेस पूर्णत्व होईल, त्यावेळेस मानवांना पूर्णपणे कल्पना येईल.

सानिध्यात असणाऱ्या मानवांना संदेश आहेत, कलियुगी स्थितीतील मानवांप्रमाणे, जी अहंकारी स्थिती आहे, ती त्यांनी पूर्णत्व नष्ट करणे हेच संदेश आहेत. सर्वज्ञ म्हणतात, सता आपण मानवी स्थितीप्रमाणे कर्तव्य करीत आहात. या कलियुगी मानवी स्थितीत कोणती स्थिती आहे? या भूतलावर अतिसूक्ष्म कोण आहे ? तर कीटक आहे. या कीटकाची चिंता कोणाला असते? अर्थातच सताला असते. ©️

You cannot copy content of this page