Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

त्रिवेणी संगम – प्रेम, समता, बंधुभाव ©️

त्रिवेणी संगम – प्रेम, समता, बंधुभाव ©️

या दरबारात एक तरी सेवेकरी काम, क्रोधाची कुरवंडी केलेला, मायेचे मूळ उपटून टाकलेला आहे असे दिसत नाही. सेवेकऱ्याने आधी केले, नंतर सांगितले तेच तुम्ही वाचता, तेच तुम्ही कृतीत आणा. सेवेकऱ्यांजवळ अजून समतेचा पाझर नाही. अजून हेवे दावे गेलेले नाहीत. अजून एकमेकांची थट्टा मस्करी करणे गेलेली नाही.

मला सांगा, एकमेकांविषयी प्रेमळपणा किती आहे? सद्गुरुं बरोबरचे नाते प्रेमळपणाचे किती आहे? हे जर अखंड नाते आहे, तर आपण कसे राहिले पाहिजे? पहा, विचार करा ! आपणाला मी जे सांगतो आहे, हे गिरवत गिरवत लक्षात ठेवून, तसे तरी करा. मनाला येईल तसे करू नका, वागू नका. आसनाधिस्तांचे संदेश असतील तसे करा.

येथे सर्वांना सारखे अधिकार आहेत. हे मी मोघम बोलत आहे. समर्थांची इच्छा असतेच की आपला सेवेकरी अशा पात्रतेचा केव्हा होईल? तेव्हा, ज्याला पटेल, तोच या ठिकाणी झटेल. ज्याला न पटेल तो आपोआप फाटेल.

कृष्णावतारात अर्जुनाचे काहीतरी संचित असले पाहिजे. त्याचप्रमाणे दुर्योधनाचे देखील असले पाहिजे. दोघेही माझ्या सानिध्यात होते, मग अर्जुनालाच पाठीशी का घातले? त्याच्याकडून कर्तव्य करून घ्यावयाचे होते. भीष्म ही त्या तऱ्हेची ज्योत होती. त्याच्याच कृतीप्रमाणे त्याला फळ दिले. दुर्योधनाला त्याच्या कृतीप्रमाणे फळ दिले. या ठिकाणी प्रेम, समता, बंधुभाव असा त्रिवेणी संगम सेवेकऱ्यांच्या हृदयात असावयास पाहिजे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page