आदेश - आपल्या सेवेकऱ्यानी प्रत्यक्ष यावर पाहणी करावी. आसनावरून आदेश सुटल्यानंतर किती ठिकाणी, कोणत्या तऱ्हेने, कोणत्या तत्वाने, तो कुठे कुठे घुमत असतो याची जाणीव घ्यावी.
(तो आदेश) चराचर, परात्पर सर्वत्र घुमतो. आसनावरून आदेश सुटल्यानंतर तो आदेश कोणाला आहे, मग तो समाधीत असो, अगर कोणत्याही उपाधीत असो, याची जाणीव घेऊन, एका क्षणात दरबारात खडे होतात. सेवेकऱ्यांचे…
कर्तव्याची फळे आपोआप मिळणार आहेत. कर्तव्य कितीही कठोर व कठीण असेल, तरी त्याचे फळ आपणास पूर्णपणे मिळणार आहे. दरबार हा उज्वल स्थितीत चालला असताना सेवेकरी हा सेवेकरीच असावा लागतो.
या दरबारचा सेवेकरी सत् शिष्य असतो. हे अजमावयाचे असते. कितीही लाघव झाले, ह्या दरबारचा सेवेकरी भीत नाही. त्याला…
सत् मार्गाने, सत् आचरणाने, सत् भक्ती युक्त अंत:करणाने ते तन काढून टाकावयास पाहिजेत. मनाची शुद्धता झाल्यानंतर सत् मार्ग दिसतो. अशा तऱ्हेने जो जातो, तिच सहज समाधी होय.
असा सर्वांग परिपूर्ण जो होतो, त्याला नेहमी सत् दिसते. पाहता येते. तेच सत्, तेच बीज, त्याचेच बीजारोपण करायचे असते. अशा तऱ्हेने…
दैविक शक्ती पेक्षा मनाची शक्ती फार मोठी आहे. कर्तव्य करीत रहा. फळ देणे घेणे स्वतःच्या आधीन नाही. केव्हां मिळेल याचा थांग लागणार नाही. उपाधी निर्माण होते. त्यावेळी नामाचा जो अमूल्य पेला आहे तो घेत रहा. निसर्गाला सुद्धा नियम आहे. प्रसंगाच्या वेळी मात्र मालिक आठवतात. इतर वेळी मालिक कोठे असतात? आताच या ठिकाणी सांगितले आहे, आपल्याकडे…
- श्री कण्व मुनी -
सत् सेवेकऱ्यांच्या ठिकाणी सुडाची भावना कधीही नसावी. या उलट अघोरांकडे ती असते.
सत् शिष्य म्हणजे ज्याच्या ठिकाणी प्रज्ञाशिलता व समता असते तो होय.
कितीही श्रेष्ठ सेवेकरी असेल, पण यत्किंचीत तमोगुण त्याचे जवळ असेल, तर त्याची किंमत मालकांजवळ नसते.
सेवेकरी दरिद्री असो, कसाही असो पण पूर्णांगी सत् असेल तर मालिक त्याच्यासाठी…
मनू + ईष म्हणजेच मनुष्य ! मनुष्य हाच ईश्वर आहे. दुसरे ईश्वर कोण आहेत? ३३ कोटी दैवते काही काळाच्या पाठीमागे, मानवातच व्यवहार करीत होती. तेच दैवत बनले. ती चित् घन वस्तू ज्याला रूप नाही, रंग नाही, आकार विकार काही नाही, अशांचे वर्णन कोण करू शकणार?
परब्रम्ह शक्ती सर्व ठिकाणी - स्वर्ग मृत्यू पाताळात वावरते. ती…
साक्षात मानव प्राणी येथपर्यंत (कैलासापर्यंत) येऊ शकत नाहीत.
महाशिवरात्र म्हणजे काय? शिव कोण?
स्वयंभू - आमच्या पेक्षाही शिव फार निराळा आहे. त्यांच्याच ध्यानात मी नेहमी निमग्न असतो. मी जर शिव असतो, तर येथे आसन टाकून बसण्याची जरूरी नाही. खरा शिव फार वेगळा आहे. आम्हीं त्यांच्याच आधीन आहोत. देव दानव सर्व त्यांच्याच आधीन आहेत. ते…
आपले कार्य अजून पुष्कळ पडलेले आहे. ते कार्य नको का करायला? मग असे करून कसे चालेल? याच्या पेक्षाही महान कार्ये दरबारात येणार आहेत. आता उघड करण्याचे काही कारण नाही. त्या कार्याकरिता या सेवेकऱ्याना कसून घेतलें पाहिजे. जर आता कसून घेतले नाही, तर याच गतीने वाटचाल करून पुढचे कार्य अपुरे राहील. अशा रीतीने सेवेकऱ्यानी कार्ये केली…
त्यांची अर्धांगिनी आली होती. जाणीव घेतली होती ना? ती दर्शना करता आली होती. जर या शक्तीला पाहू शकला नाहीत, तर पुढें वाटचाल कशी करणार? ही शक्ती दर्शना करता आली होती. काही त्यांचे उपासक आले आहेत. परंतु ह्या दरबारात कोणाचे काहीच चालणार नाही. त्यांना वाटत असेल की, हा दरबार मामुली आहे, ऋद्धीं सिध्दी आहेत, चमत्कार नमस्कार…
बाबा, मालकांना विचारणा करतांना म्हणतात, "आमच्याही पेक्षा खरा शिव न्यारा आहे. ते कसे? आम्हाला थोडेसे सांगा !
समर्थ म्हणतात, "स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी आहे. स्वयंभू हे भोळे आहेत. त्यांची कोणी भक्ती केली किंवा काहीं विचारलं सवरलं म्हणजे ते झटदिशी वचन देतात. त्यांना मागचा पुढचा विचार नाही. ते नेहमी ध्यानस्थ बसलेलें असतात. त्याला मानव तप या…
आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात…
आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही.
मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा…