अलख –
ज्ञानाची मूर्ती म्हणजे कोणती मूर्ती? कोणते नांव? असा अविनाशी आत्मा म्हणजे स्वयम् प्रकाश! त्यालाच पाहिले पाहिजे!
आपल्या शरीर रुपी पिंजऱ्यात कसे आरुढ आहेत याची जाणीव सेवेकऱ्यांनी घ्यावयास पाहिजे. जाणीव घेतल्यानंतर याच मार्गाने ज्योत गेल्यानंतर, पायरीने मग ते मालिक कसे आहेत, त्यांना आकार आहे कां? ते कोणत्या तऱ्हेने सांगतील.
मालिक प्रगट करुन सांगतात. पण…
विठ्ठल - भक्तीचे मुळ म्हणजे काय? व कसे?
प्रथम कोणतीतरी एक वस्तू आपण नजरेसमोर आणतो आणि ती वस्तू सत् कृतीने पुजतो. त्या वस्तूवर भावना असावी लागते. आता ह्या सत् कृतीची जाणीव कशापासून होईल? तर एकच ! प्रथम सद्गुरुना शरण जायला हवे. मग ती वस्तू सर्व जगात सर्व ठिकाणी वावरते याची परिपूर्ण जाणीव होईल.
आता ती…
सेवेकरी ज्यावेळेला शरण जातो, तो कोणाला शरण जातो? जे त्रिभुवन व्याप्त असून, अलिप्त आहेत, तेच आसनाधिस्त असून, त्यांनाच सेवेकरी शरण जातो. तेच ठिकाण परम शांतीचे माहेरघर, परमधाम, आश्रयस्थान, सर्व सुखांचे परमोच्च निदान आणि त्याच ठिकाणी शांतीही अखंड नांदत असते. तेच मोक्षाचे ठिकाण होय. तोच मोक्ष होय.
मग आसनाधिस्तानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करीत करीत मन एकदम…
Mulashram
ध्यास मनी, ध्यास जणी.....
घेतला वसा, टाकू कसा?
भाळी उमटवू सद्गुरु चरणांचा ठसा.....
अखिल श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन त्यांच्या समस्त भक्तगणांनी
मनी धरुनी आस,
करुया म्हणाले खास,
याचे आले प्रत्यंतर आम्हांस,
…
ज्या समर्थांनी जे तत्व सर्वांठायी विखुरलेले आहे, सर्वांठायी व्याप्त करुन ठेवलेले आहे, फेकले आहे ते नसल्यावर तू कोणाची भक्ती करणार? आणि कशी करशील? मग मी भक्ती करतो ह्याला आधार काय? कसे म्हणशील? तर सत् मार्गाला लावणारी, बुध्दीला चेतना देणारी, प्रकृतीला चेतना देणारी, सर्वस्वाला चेतना देणारी व्यक्ती एकच आणि तीच सर्व ठिकाणी व्यापक होय. ती जर…
अद्वैत भक्ती म्हणजे काय? व ती कशी करावी?
भक्ती करतो म्हणून ती होत नसते. करावयाची आहे म्हणूनही ती होत नाही. भक्ती करुन घेणारा व करणारा हा एकच असतो. तो शुद्ध स्फटिकासारखा भावना रहित असतो, कल्पना रहित, संशय रहित असतो. म्हणजे काहीच कल्पना नसते. यालाच म्हणतात अद्वैत भक्ती !…
चार दिशेला चार दरबार आहेत. दक्षिण, उत्तर व पूर्वेला एक एक दरबार आहे. उत्तरेच्या बाजूला जो दरबार आहे, त्याची गोपाल स्वामी नाम घेऊन स्थापना झाली.
वेषांतर - जठाधारी - अशा प्रकारचे आहे. पूर्वेच्या बाजूला जो दरबार आहे, त्या दरबारात आतापर्यंत तीन तऱ्हेची कार्ये होत आली. त्यात तीन…
हा दरबार दैवतांचा किंवा व्यक्तींचा दरबार नाही. अनंत काळापासून चालत आलेला हा दरबार आहे. या चार दरबारांची स्थापना अनंत काळाची आहे. त्या पैकीच हा एक दरबार आहे.
जो ज्या तऱ्हेने पाहतो त्याप्रमाणे त्याला त्याची ओळख होते. याची शोभा अनंत काळापासूनची आहे. आता कार्य करण्यासाठीं अवतार कार्य सुरू…
मानव हा मायेत गुरफटलेला आहे. त्यातून सुटका कशी होईल हे समजण्यासाठीच या दरबारची निर्मिती आहे.
चार दिशेला चार दरबार आहेत. अशा तऱ्हेचा उत्सव अनेक ठिकाणी आज होत आहे. परंतु हा स्वयं दरबार आहे. या ठिकाणी एक क्षण का होईना, प्रयत्न करने हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज या ठिकाणी अखंड तत्व प्रगट आहे. ते प्रगट…
मनुष्य हा प्राणी श्रेष्ठ मानला जातो. त्याने श्रुति, स्मृती, अनुभव ह्या तिन्हीचा त्रिवेणी संगम आपल्या ठिकाणी पूर्णत्वाने करणे आवश्यक आहे. या ठिकाणी सत् चित् आनंद एक क्षण का होईना, प्रकृतीच्या दृष्टीने का होईना, लुटण्यास मिळतो.
आपले कर्तव्य कोणते? कोठे गेल्याने परम निधान तत्व प्राप्त होईल? सत् स्वरूप,…
मानवाने सदिच्छा, सत् भावना, सत् संग या योगानें आपले कार्य भूतलावर करीत राहावे. सत् शिष्य सद्गुरूला तन, मन, धन अर्पण करून शरण जातो आणि अमूल्य असा ठेवा त्याजजवळ शिल्लक राहतो. हा अमूल्य ठेवा म्हणजेच सद्गुरु ठेवा होय.
सत् शिष्य हा सद्गुरुंचा दास, सद्गुरु सत् शिष्यांचे दास. असे…
सेवेकरी ऐकत नाहीत, म्हणून असे सांगावे लागते. दोन्ही सारखीच आहेत. असे सांगण्याचे कारण, या भीतीने तरी, त्यांनी चांगले वागावे. ज्यावेळी आपण सातारला गेला होता, त्याप्रमाणे स्थिती ठेवणे.
दरबारची वेळ ४ ते ८ दरम्यान राहिल. त्यावेळेला याच ठिकाणी ते खडे राहतील. नियमाप्रमाणे वागा व कृती करा. याने मालकांना आनंद होईल. आनंदाच्या भरात आदेश सुटतील. इच्छेप्रमाणे प्रवचन…