श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज - सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, सद्गुरुंकडून ज्ञान घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करुन ज्ञान वाढविणारी ज्योत अन् हा पांचवा प्रणव ज्या भक्ताना, ज्या सेवेकऱ्यांना प्रगट झाला असेल त्यालाच म्हणायचे सद्गुरु दर्शन ! मग अशा ठिकाणी मुक्ति राहीलीच कोठे? सद्गुरु…
गुरुदेव पितामह : साधू कोणाला म्हणतात? या दोन अक्षरात किती महान अर्थ आहे, पण या कलियुगी स्थितीत मानव स्थितीप्रमाणे म्हणजे मंत्र, तंत्र सर्वस्वांत बहरलेला म्हणजे तो साधू! पण साधू आणि मुनी यात किती फरक आहे.
साधू कलियुगी स्थितीप्रमाणे मला साध्य कसे होईल हे पाहणारा? या मानवतेत अति अति म्हणजे मोहमायेच्या पाठी धावणारा ! यांना…
श्री समर्थ मालिक - सद्गुरू ज्ञान देतात. ज्ञान सर्वांना दिलेले आहे, बहाल केलेले आहे. ते जतन करून, त्याची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु ते सांभाळता येत नाही, त्या ज्ञानाची बूज राखली जात नाही. तरी सेवेकऱ्यांनी स्वतःच्या मनाचे शोधन केले पाहिजे.
मी सेवेकरी कोणाचा? मी कोण व माझे कर्तव्य काय? मायेच्या रहित कोणीही…
आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन केले आहे, सांगितले आहे. शाप संपूर्णपणे नाहीसा झालेला नाही. त्यातून मुक्तता झालेली नाही. उ:शाप दिलेला होता तो संपूर्ण नव्हे, पण संपत आलेला आहे. तो संपल्यानंतर भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ही महाराष्ट्र भूमी…
संत समागमे धरुनी आवडी | करावी तातडी परमार्थाची ||
आत्ताच्या युगामध्ये संत मिळणे दुरापास्त आहे. ज्याला भक्तीचे मूळ पूर्णत्वाने सापडले तोच त्या ठिकाणी चिकटून राहिल, तो इकडे तिकडे भरकटत नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्या तत्त्वाशी तद्रूप राहिल्यानंतर तो शांतच आहे. त्याला सर्वस्व सापडले आहे. त्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तोच संत आहे.
या ठिकाणी…
“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच कर्तव्य झाले आहे. आहे ना कल्पना?(आहे.)
प्रत्येक अवतार कार्यात महान महान मुनिजन झाले. सता आपल्या सानिध्यात कोण आहेत? परमपूज्य गुरुदेव महामुनी वशिष्ठ, पण सता, आपणास कल्पना आहे, प्रत्येक अवतार कार्यात आपले गुरूपद…
आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. कहर झाला तरी ते सतोपदेश करीत होते. ज्यांनी ग्रहण केला त्यांना ठेवले बाकीच्यांचा नाश झाला.
गुरुदेव पितामह सत युगापासून कर्तव्य हाकीत आहे. कर्तव्य म्हणजे संयमनाचे कर्तव्य ! अघोरांना देखील सतोपदेश करीत होते.…
गुरुदेव पितामह म्हणतात, "अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, "पितामह कहर झाला तरी सतोपदेश करीत होते. ज्यांनी तो ग्रहण केला त्यांना ठेवले, बाकीच्यांचा नाश झाला."
गुरुदेव पितामह सत युगापासून कर्तव्य हाकीत आहे. कर्तव्य म्हणजे संयमनाचे कर्तव्य! अघोरांना देखील सतोपदेश करीत होते, तो त्यांनी ग्रहण न…
महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती नाही.
या भूतलावर अनंत कण निर्माण केले आहेत. या अनंत कणात, ज्या कणाला सताची पूर्णत्व कल्पना आहे, त्याच कणाची पूर्णत्व कल्पना घेतली पाहिजे. मग तो कण या स्थितीत कितीही कहर झाला…
राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला किती अडचणी निर्माण झाल्या, आहे ना कल्पना?(आहे.) म्हणूनच या कलियुगी स्थितीत पूर्णत्व उघड केले नाही. या कलियुगी स्थितीतच आपणास कर्तव्य करावयाचे आहे. २५ अवतार कार्याची मानवांना कल्पना असेल, सताने कसे कर्तव्य केले ते!
या…
गंगा : मी सर्वस्व निरूपण देते. मी अन पार्वती दोघी बहिणी. तरी सता, पार्वतीने तपश्चर्या केली. अघोरांचे नामस्मरण केले. सता आपण निवेदन घेत आहात अन मी पूर्णत्व निवेदन देत आहे. स्वयंभू बरोबर कर्तव्य करणे माझे कर्तव्य! पण सता पार्वतीने अघोर तपश्चर्या केली. स्थितीप्रमाणे मी मोठी अन ती लहान होती. लहानांचे मनोगत पूर्ण करणे हे मोठ्यांचे…
प्रभू राम : परंतु शुभदिनी थोडेसे सांगावेसे वाटते. आमच्या अवतार कार्यात थोडे का सेवेकरी होते. पण सेवेकरी कसा असावा? उदाहरण देत आहे. ज्यावेळी आम्ही वनवास पत्करला त्यावेळी अरण्यातून जात असता आम्ही एका अरण्यात पोहोचलो. समोर एक भिल्लीण होती. मनाने सत शुद्ध होती. मग आम्ही तिच्यापासून दूर होतो का?
वायुपुत्र हनुमानाला त्याच्या मातेने काय संदेश…