समर्थ मालिक – “एक तत्त्व नाम दृढ धरी मना |” जो आपली भावना दृढ धरून, एका तत्त्वाशी ठाम राहू शकतो, एक मिनीष सुद्धा इकडे तिकडे ढळत नाही, तो सेवेकरी कदापिही वाया जाऊ शकणार नाही आणि जाणारही नाही, पण मनाची चंचलता वाढली तर मात्र त्याचे त्याने समजावे. मी सांगण्यात अर्थ नाही.
शरीर हे जडत्व आहे.…
कासयासी ऐसा माझे माथा ठेवा | भार तुम्ही देवा संतजन |
विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण ||
काय वानराचे अंगी ते शक्ती | उदका तरती वरती शिळा ||
तुका म्हणे करी निमित्यची आड | चेष्टाऊणी जड दावी पुढे ||
प्रथम त्याला कृती करताना काही वाटत नाही. स्थुलात, जड देहात होता,…
विचित्र विधानी नाना कळा खेळे | नाचवि पुतळे नारायण || ज्या मानवाचे विचित्र विधान आहे, म्हणजे पूर्वीचे संचित विचित्र आहे, त्यांचे पूर्वीचे ऋण म्हणून सानिध्यात घेतले जाते. म्हणजे तो कासावीस झालेला असतो. विचित्र भोगत्वाचा त्रास होतो. संत संगतीने त्याचा थोडा थोडा क्षय होत असतो. विचित्र विधानाचे अनुसंधनाने काय करतात? ते संचित त्याला अनुसरून नाना खेळ…
धनसंपदा मिळाली म्हणजे मोक्ष आहे का? मग कृतीमान कधी होणार? मी शेषावर पहुडलो आहे. शेषावर पहुडलेले तत्त्व जर झोपलेले असते, तर मग मी अह:र्निश झोपलेलो असतो, नाही का? तर नाही. मला नाही झोप, नाही जागरण ! रात्र नाही, दिवस नाही ! आकार नाही, विकार नाही ! मग मला कसे ओळखाल?
सेवेकरी आपल्या कर्तव्यात जागृत…
भक्तीत रममाण होणे हे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. जे भोगत्व आहे, ते कोणासही सुटलेले नाही. भोगत्व नसेल तर तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असतो. फक्त कस घ्यावयाचा असेल, तर तो मीच घेऊ शकतो, इतर कोणीही नाही.
देही जर पंढरी बनली, तर तो बाकी उरला आहे असे होईल का? तर नाही. असा जर तो भक्त झाला, तर माझे…
सेवेकऱ्यांची प्रकृती भिन्न असेल, तर अभिन्न बनविण्याचा प्रयत्न करा. हे फार मोठे कर्तव्य आहे. मी भिन्न नाही, अभिन्न आहे हे लक्षात ठेवा. म्हणून किंचित मानवाने हे लक्षात घेतले पाहिजे कि प्रकृती आज आहे आणि उद्या नाही. हे मानवाना कळत असताना सुद्धा भिन्नपणे व्यवहार करतात. हे बरे नाही. बनवा बनवी, चकवा चकवी, करू नका. या बोटाची…
श्री समर्थ मालिक – समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी || समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला समर्थांशिवाय, सद्गुरुंशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा सेवेकरी अह:र्निश त्यांच्या चरणात लिन झाला असता, त्याच्यावर…
🙏 नमस्कार,
समस्त भक्तगणांना भंडारा शुभदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आज आपल्या श्री सद्गुरु माऊली कृपाशीर्वादाने वालावल आश्रमाचा ६१ वा भंडारा शुभदिन अत्यंत शांततेने, आनंदमय स्थितीने, भारावलेल्या वातावरणात साजरा केला जात आहे.
गेले दोन चार दिवसात पावसाने सर्वत्र जसा हाहा:कार उडविला आहे, तसाच तो येथेही माजविला आहे. परंतु इतुके अस्मानी संकट येऊन सुध्दा भक्तगण मंडळी मोठ्या…
हिरण्यक राक्षस फार माजलेला होता. मग त्याच्याच बालकाकडून कार्य करून घेतले. एका हिरण्यकासाठी किती रगडले गेले? प्रल्हादा मागे सुद्धा सात्विक ज्योती होत्या. त्यांचाही बचाव झाला नाही, मग सताला अजिबात त्रास होऊ नये का? त्यांना फुलासारखे ठेवू का? म्हणून मानवांना सर्वस्वाची जाणीव असून सुद्धा, मानव चुकतो का? क्षमा मागतो का?
येथील एकही सेवेकरी पूर्व संचितातून…
सत मार्गाने जाणाऱ्या ज्योतीना त्रास का? सत्य आहे. हा वाजवी प्रश्न आहे. पण सत् मार्गाने जाणाऱ्या ज्योती किती आहेत? मानव हा स्थुल देही आहे, पण पूर्व संचिताचे काय? आदी अंतापासून किती संत होऊन गेलेत त्यांनी असे विचारले नाही.
मानवाच्या मनाची चंचलता, त्याचप्रमाणे शंकाकुल स्थिती, म्हणून म्हणतो हे कलियुग आहे ! पण भक्ती आदीअंतापासून एकच…
समर्थांचा जो सेवेकरी आहे, जो सत आहे, तो सत् मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याला समर्थांशिवाय, एकाच तत्त्वाशिवाय काही दिसत नाही. असा सेवेकरी अह:र्निश चरणात लिन झालेला असला म्हणजे त्याला एखादा शत्रू, चोर, सावज कोणी जरी असले, तरी अशा सेवेकऱ्यावर चाल करतात, नाही का? तर नाही. समर्थांच्या सेवेकर्यावर कोणाचेही काही चालत नाही. चालू शकत नाही.…