श्री समर्थ मालिक – मनमिळाऊपणा – भाग एक
मनमिळावू म्हणजे काय? मन हे केवढे आहे? किती मोठे, किती बारीक आहे? पकडले तर सापडते कां? मन कोठून व कोणापासून आहे? मन म्हणजे काय? ते दिसते काय?
मन म्हणजेच माया ! माया दिसते कां? दिसे ते मायावी कसे? तत्व जे असे ते अविनाशी ! माया हि दिसते कां? तसेच मन हे दिसत नाही. आता, मन म्हणजे काय? तर हे येणारे मायावीचे तरंग ! हे दिसत नाहीत. मन हे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म असून, ते अति वेगवान आहे. ते कवटाळता येत नाही.
मन हे कोणापासून? तर मजपासोनी असे म्हटले आहे नाही कां? मज काय आहे, काय नाही? येथील आसनाचे सेवेकरी आहेत, ते मनमिळावूपणाने अभिन्नत्वाने चालले आहेत कां? तर हे जे आहे, ते जडत्वाच्या चोचल्यांमुळे आहे. ही प्रकृती अनेक रुपाने नटलेली आहे. प्रकृती अंगाने सेवेकरी पाहतात, म्हणून मनाचे तरंग विखुरतात. प्रकृती अंगाने पाहिले नाही तर ते मन अनंत तऱ्हेने धावेल का? तर हे एकाच गतीने, एकाच ठिकाणी कसे गुंतवता येईल, तर आपणाला महान तत्व बहाल केलेले आहे. त्यात सेवेकरी रममाण झाल्यानंतर त्याला दुमत भासेल कां? तर नाही. अशा तऱ्हेने सेवेकऱ्यांनी चालले पाहिजे. ©️
