Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

उघडीले मन सद्गुरुंनी !

उघडीले मन सद्गुरुंनी !

श्री समर्थ मालिक – मनमिळाऊपणा – भाग एक

मनमिळावू म्हणजे काय? मन हे केवढे आहे? किती मोठे, किती बारीक आहे? पकडले तर सापडते कां? मन कोठून व कोणापासून आहे? मन म्हणजे काय? ते दिसते काय?

मन म्हणजेच माया ! माया दिसते कां? दिसे ते मायावी कसे? तत्व जे असे ते अविनाशी ! माया हि दिसते कां? तसेच मन हे दिसत नाही. आता, मन म्हणजे काय? तर हे येणारे मायावीचे तरंग ! हे दिसत नाहीत. मन हे सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म असून, ते अति वेगवान आहे. ते कवटाळता येत नाही.

मन हे कोणापासून? तर मजपासोनी असे म्हटले आहे नाही कां? मज काय आहे, काय नाही? येथील आसनाचे सेवेकरी आहेत, ते मनमिळावूपणाने अभिन्नत्वाने चालले आहेत कां? तर हे जे आहे, ते जडत्वाच्या चोचल्यांमुळे आहे. ही प्रकृती अनेक रुपाने नटलेली आहे. प्रकृती अंगाने सेवेकरी पाहतात, म्हणून मनाचे तरंग विखुरतात. प्रकृती अंगाने पाहिले नाही तर ते मन अनंत तऱ्हेने धावेल का? तर हे एकाच गतीने, एकाच ठिकाणी कसे गुंतवता येईल, तर आपणाला महान तत्व बहाल केलेले आहे. त्यात सेवेकरी रममाण झाल्यानंतर त्याला दुमत भासेल कां? तर नाही. अशा तऱ्हेने सेवेकऱ्यांनी चालले पाहिजे. ©️

You cannot copy content of this page